Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar Death: मोठी बातमी! अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात शासकीय सुट्टी आणि 3 दिवसांचा दुखवटा जाहीर

Ajit Pawar Death: मोठी बातमी! अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात शासकीय सुट्टी आणि 3 दिवसांचा दुखवटा जाहीर

Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाचे वृत्त समजताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी माझा एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला आहे,” अशा शब्दांत त्यांनी पवारांना श्रद्धांजली वाहिली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, राज्य सरकारने तातडीने पुढील तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच, या महान लोकनेत्याला आदरांजली वाहण्यासाठी आज संपूर्ण राज्यात शासकीय सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

अविस्मरणीय नेतृत्व आणि वैयक्तिक हानी
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस कमालीचे भावूक झाले होते. त्यांनी अजित पवारांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “अजित पवारांसारखे नेतृत्व घडायला अनेक दशके लागतात आणि राज्याच्या विकासात त्यांचे योगदान खरोखर अमूल्य होते.” पवारांचे अचानक जाणे ही राज्यासाठी कधीही भरून न येणारी पोकळी असल्याचे त्यांनी नमूद केले. दादांच्या संघर्षशील व्यक्तिमत्वाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “दादा म्हणजे संकटांचा खंबीरपणे सामना करणारे नेतृत्व होते. महाराष्ट्राच्या प्रश्नांची त्यांना असलेली सखोल जाण फार कमी नेत्यांकडे पाहायला मिळते. आम्ही अनेक वर्षे जवळून काम केले आहे, त्यामुळे या घटनेवर मन अजूनही विश्वास ठेवायला तयार नाही.”

प्रशासकीय मानवंदना आणि तीन दिवसांचा दुखवटा
अजित पवारांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तीन दिवस शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या काळात नियमानुसार सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. जनसामान्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या या नेत्याच्या जाण्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी शांतता पसरली असून, संपूर्ण प्रशासन आणि जनता त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्तब्ध झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, अंत्यविधी संदर्भातील सर्व निर्णय पवार कुटुंबाशी चर्चा करूनच घेतले जातील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!