Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Solapur Crime: सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये महिला दरोडेखोरांचा राडा; सोलापूर RPF कडून 9 जणींची टोळी जेरबंद, मोठी लूट टळली

Solapur Crime: सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये महिला दरोडेखोरांचा राडा; सोलापूर RPF कडून 9 जणींची टोळी जेरबंद, मोठी लूट टळली

Solapur Crime: मुंबई-सोलापूर धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका महिला टोळीचा कट रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) उधळून लावला आहे. कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर सापळा रचून आरपीएफच्या विशेष पथकाने धाराशिव जिल्ह्यातील नऊ महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. या धाडसी कारवाईमुळे रेल्वे प्रवासादरम्यान होणारी मोठी लूट टळली असून प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

कुर्डूवाडी स्थानकावर अशी झाली कारवाई
बुधवारी कुर्डूवाडी स्थानकावर आरपीएफच्या CPDS (CPDS) पथकाचे जवान गस्त घालत असताना त्यांना काही महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. सिद्धेश्वर एक्सप्रेस येताच या महिला दरोडा टाकण्याच्या उद्देशाने डब्यांच्या आसपास दबा धरून होत्या. मात्र, पथकाने चपळाई दाखवत घेराव घालून नऊही महिलांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत या महिला रेल्वेमध्ये मोठी चोरी करण्याच्या इराद्याने आल्याचे स्पष्ट झाले.

टोळीचे ‘धाराशिव’ कनेक्शन आणि गुन्हेगारी इतिहास
अटक करण्यात आलेल्या सर्व महिला धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. धक्कादायक म्हणजे यातील अनेक महिलांवर यापूर्वी देखील रेल्वेमध्ये चोरी, पाकीटमारी आणि लूटमारीचे गुन्हे दाखल आहेत. ही टोळी केवळ सोलापूर विभागातच नव्हे, तर पुणे आणि मुंबई विभागातील रेल्वे गाड्यांमध्येही सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे.

पुढील तपास लोहमार्ग पोलिसांकडे
आरपीएफने या महिलांना अटक केल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांच्या (GRP) ताब्यात दिले आहे. ही टोळी चालवणारा मुख्य सूत्रधार कोण आहे? चोरीचे सोने किंवा मुद्देमाल त्या कुठे विल्हेवाट लावतात? या टोळीमध्ये आणखी किती सदस्य आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस आता त्यांची सखोल चौकशी करत आहेत.

प्रवाशांना आवाहन
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रवासादरम्यान दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास तातडीने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!