Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गेल्या आठ वर्षांपासून साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित; सरकारची धक्कादायक कबुली

गेल्या आठ वर्षांपासून साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित; सरकारची धक्कादायक कबुली

Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अद्यापही अपूर्णच राहिल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. सरकारने पात्र ठरवलेल्या तब्बल 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना आठ वर्ष उलटूनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. या लाभासाठी आवश्यक असलेला 5,975.51 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध न झाल्यामुळे ही प्रलंबित प्रकरणे रखडली असल्याची कबुली सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. पुरवणी मागण्यांमधून या योजनेसाठी केवळ 500 कोटींची तरतूद करण्यात आल्याने सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हायकोर्टाचे आदेश असूनही अंमलबजावणी ठप्प

विधानसभेत शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी या योजनेबाबत तारांकित प्रश्न विचारल्यानंतर ही माहिती प्रकाशात आली. उच्च न्यायालयाने पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही, योजनाच्या अंमलबजावणीत निधीअभावी झालेला विलंब शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण करणारा आहे.

हेही वाचा – Pune Land Scam : ‘FIR मध्ये नाव नाही म्हणून…’;  देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर पार्थ पवारांचं वाढणार टेन्शन

मुख्यमंत्री सहायता निधीत तब्बल 1 अब्ज, पण शेतकऱ्यांना फक्त 75 हजार

एका बाजूला मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात तब्बल एक अब्ज रुपये जमा झाले. पण अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ 75,000 रुपये जमा झाल्याची माहिती आरटीआयद्वारे उघड झाली. आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाट यांनी केलेल्या चौकशीत हा विरोधाभास समोर आला. साखर कारखान्यांना ‘प्रति टन ऊस 10 रुपये मुख्यमंत्री निधीसाठी’ जमा करण्याचे राज्य सरकारने दिलेले निर्देश वादग्रस्त ठरले होते. तरीही हा निधी लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची बाब ठळकपणे समोर आली आहे.

हेही वाचा – Hurda Party: मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांनी केली कुमार सानूच्या ‘या’ गाण्याची फर्माइश

अतिवृष्टी मदतपॅकेजही अडचणीत

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची वाटचालही सुरळीत नाही. ई-केवायसी अपूर्ण राहणे, बँक आणि आधारमधील विसंगती, तसेच पोर्टलवरील तांत्रिक अडचणी यांमुळे 5 लाख 42 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना जाहीर मदतीचा फायदा मिळालेला नाही. परिणामी 355 कोटी 55 लाख रुपये शासनाच्या तिजोरीतच अडकून पडले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!