Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

K Annamalai: ‘मी मुंबईत येणारच, हिंमत असेल तर…’; भाजप नेते अण्णामलाई यांचे ठाकरे बंधूंना खुले आव्हान

K Annamalai: ‘मी मुंबईत येणारच, हिंमत असेल तर…’; भाजप नेते अण्णामलाई यांचे ठाकरे बंधूंना खुले आव्हान

K Annamalai: मुंबईच्या अस्मितेवरून तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई आणि ठाकरे बंधूंमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे. ‘मला मुंबईत येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, तुम्हाला जे करायचे ते करा,’ अशा शब्दांत अण्णामलाई यांनी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढणाऱ्यांना त्यांनी ‘मूर्ख’ संबोधल्याने या राजकीय संघर्षात आता नवी ठिणगी पडली आहे.

काय आहे अण्णामलाईंचे स्पष्टीकरण?

मुंबई महाराष्ट्राची नाही, या त्यांच्या कथित विधानावर सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर अण्णामलाई यांनी तामिळ माध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली. ते म्हणाले, आपण पंतप्रधान मोदींना भारताचे नेते म्हणतो, म्हणजे ते गुजराती नाहीत का? कामराज यांना देशाचे नेते म्हणतो, म्हणजे ते तामिळ नाहीत का? तसेच, मुंबईला ‘जगाची राजधानी’ म्हणणे म्हणजे ती मराठी माणसाने उभारली नाही असा अर्थ होत नाही. मुंबई ही मराठी बांधव आणि भगिनींच्या अपार कष्टातूनच उभी राहिली आहे, हे सत्य नाकारता येणार नाही, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

हेही वाचा – Raj Thackeray : ‘इंजिनमध्ये बसून मशालीने विरोधकांना जाळू’; महायुतीवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

‘सामना’च्या धमकीला प्रत्युत्तर

‘सामना’मधून मिळालेल्या पाय तोडण्याच्या धमकीवर अण्णामलाई संतापले आहेत. “मी अशा धमक्यांना आणि दहशतीला घाबरणारा माणूस नाही. जर घाबरलो असतो, तर गावी घरातच बसून राहिलो असतो. मी मुंबईत येणारच आहे, काय करायचे ते करून घ्या,” असे सडेतोड उत्तर त्यांनी दिले.

ठाकरे बंधूंवर बोचरी टीका

अण्णामलाई यांनी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवताना म्हटले की, दोन्ही भावांकडे सध्या कोणतेही ठोस काम नसल्याने ते इकडे-तिकडे फिरून विधाने करत आहेत. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर आहे, पण आज जर ते जिवंत असते, तर या लोकांकडे (ठाकरे बंधूंकडे) कोणतेही राजकीय स्थान उरले नसते. हे लोक केवळ वडिलांचा वारसा संपवण्याचे काम करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!