Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News: पुण्यातील 15 लाख वाहने RTO च्या रडारवर; ‘या’ एका चुकीमुळे बसू शकतो मोठा आर्थिक फटका

Pune News: पुण्यातील 15 लाख वाहने RTO च्या रडारवर; ‘या’ एका चुकीमुळे बसू शकतो मोठा आर्थिक फटका

HSRP Number Plate : मागील अनेक महिन्यांपासून केवळ सूचना देणाऱ्या परिवहन विभागाने आता प्रत्यक्ष कारवाईसाठी कंबर कसली आहे. वारंवार संधी देऊनही ज्या वाहनधारकांनी अद्याप आपल्या गाडीला ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) बसवलेली नाही, त्यांच्यावर येत्या १५ फेब्रुवारीपासून दंडाचा हातोडा पडणार आहे.

पुणेकरांची अनास्था: १५ लाख गाड्या अजूनही जुन्याच नंबरप्लेटवर
पुणे शहरात वाहनांची संख्या मोठी असली तरी नियमांच्या अंमलबजावणीत शहर मागे असल्याचे चित्र आहे. पाच वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने आता ‘शॉक ट्रीटमेंट’ देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

  • एकूण वाहने: २५ लाख
  • नियम पाळलेली वाहने: केवळ ८.६२ लाख
  • मोठं आव्हान: तब्बल १५ लाख वाहनधारकांनी अद्याप नवीन नंबरप्लेट बसवलेली नाही.

दहा हजारांचा फटका आणि ‘चौफेर’ तपासणी
१५ फेब्रुवारीनंतर रस्त्यावर उतरणाऱ्या तपासणी पथकांकडून केवळ नंबरप्लेटच पाहिली जाणार नाही, तर पूर्ण ‘कुंडली’ तपासली जाईल:

  • अवजड दंड: नियमांचे उल्लंघन केल्यास १,००० ते १०,००० रुपयांपर्यंत भुर्दंड सोसावा लागू शकतो.
  • इतर कागदपत्रे: नंबरप्लेटसोबतच विमा, पीयूसी (PUC) आणि परवाना (License) यांचीही कडक तपासणी केली जाईल.
  • कोणाला सवलत? ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे पण अद्याप प्लेट मिळालेली नाही, त्यांना तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

का केली जातेय सक्ती?
वाहनांची सुरक्षितता वाढवणे आणि गुन्हेगारीला लगाम घालणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. HSRP मुळे वाहन चोरीला गेल्यास त्याचा माग काढणे सोपे होते आणि बनावट नंबरप्लेटचा वापर थांबवता येतो.

संघटनांची भूमिका
रिक्षा फेडरेशनने ही प्रलंबित संख्या पाहता आणखी दोन महिन्यांच्या मुदतवाढीची मागणी केली आहे. मात्र, “पुरेशी संधी देऊन झाली आहे, आता शिस्त हवीच,” अशा कडक भूमिकेत परिवहन विभाग दिसत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!