Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘भाजप पार्थ पवारांना वाचवत आहे…’; अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

‘भाजप पार्थ पवारांना वाचवत आहे…’; अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

Pune Land Scam: पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याभोवती नवीन वाद निर्माण झाला आहे. संबंधित जमिनीचा व्यवहार त्यांच्या अमेडिया कंपनीमार्फत सुरू होता, असा आरोप होत असून, अजित पवारांनी हा व्यवहार रद्द केल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अद्याप पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने विरोधकांनी सरकार आणि भाजपवर तीव्र टीका सुरू केली आहे.

शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, “या प्रकरणात भाजपाकडून पार्थ पवारला वाचवले जात आहे.” त्यांनी सांगितले की, वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत आरोपांनंतर अजित पवारांनी “मी राजीनामा देतो आणि सरकारला बाहेरून पाठिंबा देतो” अशी भूमिका घेतल्याचा खुलासा झाला आहे. दानवे म्हणाले, ‘भाजपच अडचणीत आणते आणि भाजपच वाचवते. पार्थ पवार कंपनीचे डायरेक्टर असतानाही त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही, हे कसे शक्य आहे? व्यवहार झाला नाही म्हणून मुद्रांक शुल्क न भरण्याचे कारण दिले जाते, पण नियमाप्रमाणे शुल्क भरल्याशिवाय व्यवहार रद्द होत नाही. बावनकुळे यांची भूमिका चुकीची आहे. पार्थ पवारला भाजप वाचवत आहे.’

हेही वाचा –  पार्थ पवार जमीन घोटाळ्याची चौकशी तुकाराम मुंढेंकडून? काँग्रेसची मोठी मागणी

त्यांनी पुढे म्हटले, “पार्थ पवार लहान बाळ नाहीत. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांना ‘एखाद्याचा मुलगा’ म्हणून नव्हे, तर सामान्य नागरिक आणि गुन्हेगार म्हणूनच वागवले पाहिजे. तहसीलदारावर दोष टाकून मोठ्या अधिकाऱ्यांना आणि पार्थ पवारांना वाचवले जात आहे. एका तहसीलदाराकडे एवढी हिंमत असूच शकत नाही. जिल्हाधिकारी यामध्ये निष्क्रिय कसे राहू शकतात?”

दानवे यांच्या मते, मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय पार्थ पवारांना या प्रकरणात दिलासा मिळू शकत नाही. त्यांनी दावा केला की, “अजित पवारांनी सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी दाखवली होती, पण भाजपकडून संपूर्ण घटनाक्रम आधीच नियोजित होता.” या खुलाशामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून विरोधकांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!