Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आमदार माऊली आबा कटके यांच्या प्रयत्नांना यश! शिरूर घोडनदी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन होणार

आमदार माऊली आबा कटके यांच्या प्रयत्नांना यश! शिरूर घोडनदी येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन होणार

पुणे: शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. राज्य मंत्रिमंडळाने पुणे जिल्ह्यातील शिरूर घोडनदी येथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) तसेच शासकीय अभियोक्ता कार्यालय स्थापन करण्यास अखेर मंजुरी दिली आहे. या न्यायालयांसाठी आवश्यक पदनिर्मितीलाही मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला असून, त्यामुळे शिरूर आणि परिसरातील न्यायप्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होणार आहे.

आतापर्यंत शिरूर आणि हवेली तालुक्यातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी पुणे शहरात वारंवार जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत होता. आता शिरूर घोडनदीतच जिल्हा न्यायालय स्थापन झाल्याने नागरिकांना स्थानिक पातळीवर न्याय मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

आमदार माऊली आबा कटके यांचा पाठपुरावा यशस्वी

या ऐतिहासिक निर्णयामागे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी विधी व न्याय विभाग, मुख्यमंत्री कार्यालय आणि उपमुख्यमंत्री (गृहमंत्री) यांच्याशी सातत्याने संवाद साधत हा प्रस्ताव पुढे नेला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. आमदार कटके म्हणाले की, शिरूर-हवेली मतदारसंघातील जनतेच्या दीर्घ प्रतीक्षेला आज न्याय मिळाला आहे. हा निर्णय न्याय लोकांच्या दारी आणणारा आणि प्रशासन अधिक जवाबदार बनवणारा आहे. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील.

हेही वाचा – Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस बसायला गेले अन् खुर्ची तुटली, जागेवरच बसले खाली, नेमकं काय घडलं?

त्यांनी पुढे सांगितलं की, न्यायालय स्थापनेमुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील. शासन यंत्रणांशी सातत्याने संवाद साधून हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यात आम्ही यशस्वी झालो. शिरूर घोडनदी परिसरातील नागरिक, वकील संघटना, ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. न्यायालय स्थापनेमुळे शिरूर, हवेली, पारगाव, बेलवाडी, घोडनदी आणि आसपासच्या भागातील नागरिकांना न्याय मिळविणे आता अधिक सुलभ होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!