Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ‘या’ तारखेपर्यंत होणार सुरू

Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ‘या’ तारखेपर्यंत होणार सुरू

Pune Metro: पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी मेट्रो जाळ्याचा विस्तार आता युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या शहरात दोन मार्गांवर मेट्रो धावत असली तरी, लवकरच तिसरी मार्गिका म्हणजेच ‘मेट्रो लाईन ३’ पुणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा २३.३ किमीचा महत्त्वपूर्ण मार्ग ३१ मार्च २०२६ पर्यंत सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

आयटी हब थेट शहराशी जोडले जाणार

हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांसाठी ही मेट्रो लाईन वरदान ठरणार आहे. विशेष म्हणजे, ही नवीन मार्गिका ‘सिव्हिल कोर्ट’ स्थानकावर सध्याच्या लाईन १ आणि २ ला स्कायवॉकद्वारे जोडली जाईल. या ‘कनेक्टिव्हिटी’मुळे प्रवाशांना संपूर्ण शहरात कोठेही जाणे सुलभ होईल आणि मेट्रोच्या प्रवासी संख्येतही मोठी वाढ होईल.

हेही वाचा – लग्नापूर्वीचं जोडप्याने स्टेशनवर केलं ‘असं’ काम की, पुणे मेट्रोने ठोठावला दंड

केंद्राची मंजुरी

पुणे मेट्रोच्या पुढील टप्प्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत:

पिंपरी-चिंचवड ते निगडी: या मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून सप्टेंबर २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

खराडी ते खडकवासला: या विस्तारालाही केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, यामुळे शहराच्या पूर्व-पश्चिम भागांना मोठी जोडणी मिळेल.

रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक: या दोन महत्त्वाच्या मार्गांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. तथापी, स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मार्गाचे काम तांत्रिक कारणांमुळे सध्या रखडले असले तरी, इतर मार्गांच्या कामांना गती देण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!