Today बुधवार, 12th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Indapur Depot: संत बाळुमामा दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा; इंदापूर-आदमापूर थेट बससेवा सुरू

Indapur Depot: संत बाळुमामा दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा; इंदापूर-आदमापूर थेट बससेवा सुरू

Indapur Depot: प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन इंदापूर आगाराने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून इंदापूर-कोल्हापूर ही बसफेरी आता आदमापूरपर्यंत वाढवण्यात आली आहे. 13 नोव्हेंबरपासून ही विस्तारित बससेवा नियमित स्वरूपात सुरू करण्यात आली असून त्यामुळे भाविकांसह सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. संत बाळुमामा यांच्या दर्शनासाठी आदमापूरकडे जाणाऱ्या भाविकांना आता थेट बससेवेचा लाभ मिळणार आहे. यामुळे प्रवासातील वेळ आणि त्रास दोन्ही कमी होणार असून नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा –Indapur: इंदापूरच्या चेतना फार्मसी कॉलेजची आरती कारंडे ठरली दुहेरी शैक्षणिक शिष्यवृत्तीची मानकरी

ही बस इंदापूर येथून सकाळी 11.45 वाजता सुटून जंक्शन, नातेपुते, शिंगणापूर, दहीवडी, वडूज, पुसेसावली, कराड आणि कोल्हापूर असा मार्ग पार करत सायंकाळी 7.40 वाजता आदमापूर येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात हीच बस आदमापूरहून सकाळी 5.30 वाजता निघून दुपारी 1.25 वाजता इंदापूरला दाखल होईल.

हेही वाचा – इंदापूरमधील सरकारी रुग्णालयाच्या निष्काळजीपणाबद्दल संताप; पत्रकार सुरेश जकातेंचा मृतदेह दीड तास शवविच्छेदन दाराशीच

दररोज चालणाऱ्या या बसफेरीसह पौर्णिमा व अमावस्येच्या दिवशी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकडून या सेवेचा विशेष प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या मागणीची दखल घेत डेपो मॅनेजर वैभव गोसावी व स्थानक प्रमुख संजय वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू करण्यात आली असून, या निर्णयामुळे प्रवास अधिक सुलभ झाला आहे, अशी माहिती नियंत्रक विक्रम चंदनशिवे यांनी दिली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!