Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shrikant Shinde: ‘हे तर पाठीत खंजीर खुपसण्यासारखे…’; अंबरनाथमधील भाजप-काँग्रेस युतीवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Shrikant Shinde: ‘हे तर पाठीत खंजीर खुपसण्यासारखे…’; अंबरनाथमधील भाजप-काँग्रेस युतीवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Shrikant Shinde: अंबरनाथ नगर परिषदेच्या राजकारणात झालेल्या एका धक्कादायक भूकंपाने राज्याच्या महायुतीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणाऱ्या भाजपने अंबरनाथमध्ये थेट काँग्रेससोबत हातमिळवणी केली. शिंदे गटाला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी झालेल्या या अनपेक्षित युतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, शिवसेनेने (शिंदे गट) यावर अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

भाजप-काँग्रेसच्या ‘अजब’ युतीने गाठले बहुमत

अंबरनाथ नगर परिषदेत भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी महापौरपद जिंकले आहे. भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) 4 अशा एकूण 32 नगरसेवकांच्या पाठबळावर भाजपने स्पष्ट बहुमत सिद्ध केले. यामुळे शिवसेनेच्या 27 नगरसेवकांना विरोधी बाकावर बसावे लागले आहे. या घडामोडीनंतर शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत, ही युती म्हणजे शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे, असा गंभीर आरोप केला.

हेही वाचा – BJP Congress Alliance: अंबरनाथमध्ये भाजपशी हातमिळवणी भोवली! काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांचे निलंबन; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार श्रीकांत शिंदे यांचे भाजपला चॅलेंज

एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या प्रकरणावर सावध पण टोकदार प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले, अंबरनाथमधील ही युती आमचा मित्रपक्ष असलेल्या भाजपसाठी एक मोठा प्रश्न आहे आणि याचे उत्तर भाजपचे नेतेच अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकतील. अनेक वर्षांपासूनची भाजप-शिवसेना युती केंद्र आणि राज्य पातळीवर अखंड राहिली पाहिजे, ही आमची भावना आहे. आम्ही अंबरनाथमध्ये उत्तम विकासकामे केली आहेत, आता भाजप जो काही निर्णय घेईल त्यावर शिवसेना आपल्या भूमिकेनुसार विकासाचे राजकारण करेल.

या वादात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी सांगितले की, आम्ही भाजपला एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजुळे पाटील यांनी पलटवार करताना म्हटले की, गेल्या 25 वर्षांपासून भ्रष्टाचारात गुंतलेल्यांसोबत राहणे ही खरी अयोग्य युती ठरली असती. आम्ही चर्चेसाठी प्रयत्न केले, पण शिंदे गटाने दाद दिली नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!