Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bhor Mahad Highway Accident: नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाताना काळाचा घाला; भोर-महाड मार्गावर टेम्पो 20 फूट दरीत कोसळला, 9 जण…

Bhor Mahad Highway Accident: नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाताना काळाचा घाला; भोर-महाड मार्गावर टेम्पो 20 फूट दरीत कोसळला, 9 जण…

Bhor Mahad Highway Accident: नातेवाईकाच्या निधनाचे दु:ख सावरत अंत्यविधीसाठी निघालेल्या किवत गावातील ग्रामस्थांवर वाटेतच भीषण संकट ओढवले. भोर-महाड मार्गावरील शिरगाव घाटात प्रवाशांनी भरलेला एक टेम्पो नियंत्रणाबाहेर गेल्याने थेट २० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात ९ जण गंभीर जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

नेमकी घटना काय?
भोर तालुक्यातील किवत गावचे १५ ते २० नागरिक एका टेम्पोतून महाडच्या दिशेला अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. शिरगाव परिसरातील एका धोकादायक वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेला हा टेम्पो संरक्षक कठडा तोडून थेट दरीत कोसळला. भीषण आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांचे धाडसी बचावकार्य
अपघाताची माहिती मिळताच शिरगावमधील स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी झेप घेतली. दरी खोल आणि उतार कठीण असल्याने ग्रामस्थांनी दोरखंडाच्या साहाय्याने आणि मानवी साखळी करून जखमींना बाहेर काढले. अवघ्या काही वेळातच ९ गंभीर जखमींना दरीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

प्रशासनाविरुद्ध ग्रामस्थांचा संताप
भोर-महाड मार्ग हा अतिशय अरुंद आणि नागमोडी वळणांचा आहे. या मार्गावरील संरक्षक कठडे कमकुवत झाल्याने अपघात वाढत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. “प्रशासनाने तातडीने या मार्गाची दुरुस्ती करावी, अन्यथा मोठे अपघात घडतच राहतील,” अशी संतप्त मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!