Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कोळगाव धरणातून बेकायदा वाळू उपसा, बोटीसह परराज्यातील तिघे ताब्यात; बोटमालक फरारी

कोळगाव धरणातून बेकायदा वाळू उपसा, बोटीसह परराज्यातील तिघे ताब्यात; बोटमालक फरारी

करमाळा: कोळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उपसा केलेल्या वाळूसह यांत्रिक बोट आणि इतर सामग्री करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तालुक्यातील निमगाव (ह.) येथे धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथील बोट मालकाच्या बोटीद्वारे तीन परप्रांतीयांकडून हा उपसा सुरू होता.

याबाबत पो.शि. सतीश वामन एनगुले (नेमणूक करमाळा पोलीस ठाणे) यांनी दि. १५ जानेवारी रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १५ जानेवारी
रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोळगांव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात करमाळा तालुक्यातील निमगाव (ह.) येथील जलाशयातून संशयित आरोपी फैजुल माफीजुद्दीन शेख (वय-२८, रा. गुहीटोला, पो. पलाशगच्छी, आंचल-उधवा, थाना राधानगर, ता. उत्तर पलाशगच्छी, जि. साहेबगंज, राज्य झारखंड), असरफ असाराऊल शेख (वय २१, रा. दरगांडगा, ता. उधुआ, जि. साहेबगंज, झारखंड), रबुल सजल शेख (वय-२७, रा. बिकल टोला, प्लासगाछी, ता. उत्तर पलासगछी, जि. साहेबगंज, झारखंड) व बोटमालक अविनाश अभिमान हांगे (वय-३१, रा. सोनारी, ता. परंडा, जि. धाराशिव) यांनी संगनमत करून पर्यावरणाचा ऱ्हास होईल हे माहीत असताना देखील महसूल विभागाचा परवाना व रॉयल्टी नसताना कोळगाव धरणाच्या जलाशयातून बोटीने व सक्शन पाईपने वाळू काढून त्याचा साठा करून ती चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आला आहे.

या कारवाईत करमाळा पोलिसांनी ३ लाख रुपये किमतीची एक यांत्रिक बोट व इतर सामुग्री, ८० हजार किमतीचा एक सक्शन पाईप, इतर सामुग्री आणि २० हजार रुपये किमतीची एकूण अंदाजे ४ ब्रास वाळू असा एकूण ४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून पोलिसांनी तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!