Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात परवेश वर्मा, नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपने दिले तिकीट

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात परवेश वर्मा, नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपने दिले तिकीट

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात माजी खासदार परवेश वर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने पहिल्या यादीत 29 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. गांधीनगरचे विद्यमान आमदार अनिल बाजपेयी यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी अरविंदर सिंग लवली तेथून निवडणूक लढवणार आहेत. अनिल गोयल यांना कृष्णा नगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

परवेश वर्मा हे माजी खासदार आहेत. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट दिले नव्हते. ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते साहेब सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत. नुकतेच त्याच्यावर राहत्या घरी महिलांना पैसे वाटल्याचा आरोप झाला होता. नवी दिल्ली मतदारसंघातील लढत अत्यंत चुरशीची आहे. काँग्रेसने संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. संदीप दीक्षित हे माजी खासदार आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत.

यावेळी दिल्लीतील निवडणूक लढत तिरंगी होणार आहे. काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढत आहे. त्याचबरोबर भाजपही चांगलाच आक्रमक आहे. पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आप सरकार रोज नवनवीन योजना जाहीर करत आहे. शनिवारीच आम आदमीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील पाण्याची बिले माफ करण्याची घोषणा केली आहे. आप आणि काँग्रेसने आपले उमेदवार आधीच जाहीर केले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!