Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Delhi Riots Case: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! उमर आणि शरजील तुरुंगातच राहणार

Delhi Riots Case: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! उमर आणि शरजील तुरुंगातच राहणार

Delhi Riots Case: २०२० च्या दिल्ली दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने या दोघांचे जामीन अर्ज फेटाळले असून त्यांना सध्या तुरुंगातच राहावे लागणार आहे. मात्र, याच प्रकरणातील इतर पाच आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणाला मिळाला जामीन?

न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने सोमवारी या प्रकरणावर महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने गुलफिशा फातिमा, मीरान हैदर, शिफा-उर-रहमान, मोहम्मद सलीम खान, शादाब अहमद या पाच आरोपींना जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा – दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा! आरोपी डॉक्टराकडून सिग्नल अॅप, आय-20 कार खरेदीसह धक्कादायक माहिती उघड

दिग्गज वकिलांची फौज मैदानात

या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता दोन्ही बाजूंनी वरिष्ठ वकिलांनी युक्तिवाद केला. आरोपींच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, सिद्धार्थ दवे, सलमान खुर्शीद आणि सिद्धार्थ लुथरा यांनी बाजू मांडली. तर दिल्ली पोलिसांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी जामीन देण्यास विरोध केला. गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी सर्व पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.

काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी २०२० मध्ये ईशान्य दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधात निदर्शने सुरू असताना हिंसाचार उसळला होता. या दंगलीत ५३ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले होते. उमर खालिद, शरजील इमाम आणि इतरांवर या दंगलीचा मुख्य कट रचल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २ सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या सर्वांचा जामीन फेटाळला होता, ज्याला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आजच्या निर्णयामुळे उमर आणि शरजील यांच्या अडचणी कायम राहिल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!