Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बिहार सरकारचे खातेवाटप जाहीर! नितीश कुमारांनी गृहखातं सोडलं; भाजपच्या ‘या’ मंत्र्याकडे देण्यात आली जबाबदारी

बिहार सरकारचे खातेवाटप जाहीर! नितीश कुमारांनी गृहखातं सोडलं; भाजपच्या ‘या’ मंत्र्याकडे देण्यात आली जबाबदारी

Bihar Cabinet Expansion: मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नवीन बिहार सरकारने गुरुवारी मंत्र्यांमध्ये खातेवाटप केले. यावेळी भाजप, जेडीयू, लोजपा(रामविलास), HAM आणि RLM या सर्व घटक पक्षांना विविध महत्त्वाची मंत्रालये देण्यात आली. तथापी पहिल्यांदाचं नितीश कुमार यांनी गृहमंत्रीपद सोडलं आहे. भाजपचे मंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी देण्याच आली आहे. नवीन खातेवाटपात भाजप कोट्यातील मंत्र्यांना अनेक टॉप पोर्टफोलिओ मिळाले आहेत. यामध्ये प्रमुख विभागांचा समावेश:

  • गृह विभाग – सम्राट चौधरी
  • जमीन आणि महसूल – विजय कुमार सिन्हा
  • आरोग्य व कायदा – मंगल पांडे
  • उद्योग – दिलीप जयस्वाल
  • शहरी विकास व गृहनिर्माण – नितीन नवीन
  • कृषी – राम कृपाल यादव

याशिवाय कामगार संसाधन, पर्यटन, पशुसंवर्धन व मत्स्य, आपत्ती व्यवस्थापन, मागास व अतिमागास कल्याण, SC-ST कल्याण, IT, क्रीडा आणि सहकार यांसारखी विभागे देखील भाजपला देण्यात आली आहेत. तथापी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या पक्षाच्या जेडीयूच्या कॅबिनेट सदस्यांना जलसंपदा, ऊर्जा, ग्रामीण विकास, ग्रामीण बांधकाम, अन्न, ग्राहक व्यवहार, समाज कल्याण, शिक्षण आणि अल्पसंख्याक व्यवहार विभागांचे वाटप केले. याशिवाय वित्त व व्यावसायिक कर विभागही जेडीयूकडेच राहील अशी चर्चा आहे.

हेही वाचा – Bihar Election : बिहारमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर?

दरम्यान, पहिल्यांदाच सरकारमध्ये आलेल्या रामविलास पासवान यांच्या लोजपा पक्षाच्या मंत्र्यांमध्ये ऊस उद्योग आणि सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग विभागले गेले आहेत, तर राष्ट्रीय लोक मोर्चाचे दीपक प्रकाश यांना पंचायती राज विभाग देण्यात आला आहे आणि एचएएम पक्षाचे संतोष कुमार सुमन यांना लघु जलसंपदा विभाग देण्यात आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!