Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘जोडीदार मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही…’; शरद पवार यांना लग्नाळू तरुणाचं पत्र

‘जोडीदार मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही…’; शरद पवार यांना लग्नाळू तरुणाचं पत्र

अकोला: लग्न करून सुखी संसार करण्याचं स्वप्न प्रत्येक तरुणाचं असतं. मात्र काहींचं नशिब इतकं कठीण ठरतं की वय वाढतं, पण विवाह जमत नाही. अशाच एका अकोल्यातील तरुणाने स्वतःच्या वैवाहिक अडचणीसाठी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची मदत मागितली आहे. या तरुणाने पवार साहेबांना एक भावनिक पत्र लिहून ‘मला लग्नासाठी मुलगी मिळत नाही, कृपया माझी मदत करा,’ अशी थेट विनंती केली आहे. हे अनोखं पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं असून सर्वत्र त्याची चर्चा रंगली आहे.

शरद पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याच्या ग्रामीण भागातील हा तरुण शेतकरी कुटुंबातील असून त्याने पवार साहेबांच्या अकोला दौऱ्यादरम्यान हे पत्र प्रत्यक्ष दिलं. पत्रात त्याने म्हटलं आहे की, “मी शेतकरी वर्गातील आहे, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे कुणीही आपली मुलगी देत नाही. माझं वय 34 वर्षं झालं आहे, पण अजून लग्न होत नाही. कृपया माझ्या संसारासाठी जोडीदार मिळवून द्या.”

त्याने पुढे म्हटलं आहे की, “मला कोणत्याही समाजातील मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे. तिच्या माहेरी जाऊन राहायलाही हरकत नाही. मी तिथे प्रामाणिकपणे काम करेन आणि चांगला संसार उभा करेन.” या पत्राच्या शेवटी त्या तरुणाने लिहिलं, “माझ्या पत्राचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही.”

हेही वाचा – निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला मोठा दिलासा! ‘तुतारी’ सदृश ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

शरद पवारांकडून प्रतिसाद

या घटनेची माहिती मिळाल्यावर राष्ट्रवादी पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले की, पवार साहेबांनी पक्षाच्या बैठकीत हे पत्र वाचून घेतले आणि जयंत पाटील यांना त्या तरुणाच्या लग्नासाठी मदत करण्याच्या सूचना दिल्या. अनिल देशमुख म्हणाले, “अकोल्यातील त्या तरुणाने दिलेलं पत्र साहेबांनी गांभीर्याने घेतलं. बैठकीतच जयंत पाटील यांना हे पत्र वाचायला सांगितलं आणि त्या तरुणासाठी वधू शोधण्याचे प्रयत्न करण्याचे आदेश दिले. आता विदर्भातील आमचे कार्यकर्ते या तरुणासाठी योग्य जोडीदार शोधण्याचे प्रयत्न करत आहेत.”

हेही वाचा – बीडमधील राजकीय गणित बिघडणार? ‘हा’ बडा नेता सोडणार शरद पवारांची साथ

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

या भावनिक पत्रामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. काहींनी या तरुणाच्या प्रामाणिक विनंतीचं कौतुक केलं, तर काहींनी या तरुणाच्या पत्राला मजेशीर असं म्हटलं आहे. मात्र, या प्रसंगाने ग्रामीण भागातील विवाहातील सामाजिक आणि आर्थिक अडचणींचं वास्तव पुन्हा एकदा समोर आणलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!