Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विश्वविजेत्यांसाठी BCCI ने उघडली तिजोरी; जेतेपद जिंकल्यानंतर भारतीय संघाला दिले ‘इतक्या’ कोटीचे बक्षीस

विश्वविजेत्यांसाठी BCCI ने उघडली तिजोरी; जेतेपद जिंकल्यानंतर भारतीय संघाला दिले ‘इतक्या’ कोटीचे बक्षीस

Women’s World Cup 2025: यंदाच्या महिला विश्वचषकात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. या विजयात शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्माने निर्णायक भूमिका बजावली. बीसीसीआयने या भव्य विजयानंतर भारतीय महिला संघासाठी ५१ कोटी रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, जय शाह यांच्या पुढाकारामुळे महिला क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झाले असून या विजयाने त्या प्रयत्नांना नवी उंची दिली आहे. बक्षीस रक्कम मूळ २.८८ दशलक्ष डॉलर्सवरून वाढवून १४ दशलक्ष डॉलर्स करण्यात आली आहे.

अंतिम सामन्याचा आढावा

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत २९८ धावा केल्या. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी १०४ धावांची शानदार सलामी भागीदारी दिली. शेफालीने ७८ चेंडूत ८७ धावा केल्या, तर दीप्ती शर्माने ५८ धावांचे योगदान दिले. रिचा घोषने शेवटी झंझावाती खेळी करत २४ चेंडूत ३४ धावा ठोकल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही. कर्णधार लॉरा वोल्वार्डने १०१ धावा केल्या तरी संपूर्ण संघ २४६ धावांवर आऊट झाला. दीप्ती शर्माने शानदार गोलंदाजी करत ५ बळी घेतले, तर शेफाली वर्माने २ विकेट्स घेतल्या.

पुरस्कार वितरण

  • सामनावीर: शेफाली वर्मा
  • स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू: दीप्ती शर्मा
  • संघाचे एकूण बक्षीस: ५१ कोटी (बीसीसीआयकडून)

भारतीय महिला क्रिकेटसाठी हा विजय एक ऐतिहासिक टप्पा ठरला असून, जगभरात भारतीय महिला संघाच्या धडाकेबाज कामगिरीचं कौतुक होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!