Anjali Damania On Dhananjay Munde: महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत मित्रपक्षातील कुरघोड्या तसेच विरोधकांच्या गटांमधील तणाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा निशाणा साधला असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर आणि काही राजकीय कुटुंबांवर गंभीर टीका केली आहे.
अंजली दमानिया यांनी पुण्यातील जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात पार्थ पवार यांना संरक्षण देण्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, यंत्रणांकडून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने एफआयआर नोंदवत आला नाही. जर सामान्य व्यक्ती असेल, तर लगेच एफआयआर नोंदवला जातो, पण पार्थ पवार असल्यामुळे कायदा हाताळला जात नाही, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी पुढे म्हटलं आहे की, खर्गे समितीला पुरावे दिले गेले असून, वीज बिल पार्थ पवारांच्या नावावर आहे. इओडब्ल्यूच्या तक्रारींमध्ये शितल तेजवानी यांचे सर्व पुरावे मिसाळ कडे आहेत. कोण खरा सहभागी आहे, कोण सूत्रधार आहे हे तपासावे. पार्थ पवारांवर गुन्हा नोंदवला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अंजली दमानिया यांनी गौरी पालवे आत्महत्या प्रकरणावरही तीव्र मत व्यक्त केले. त्यांच्या मते, आरोपी दीर अजय आणि ननंद शीतल यांना चौकशीसाठी बोलावले गेले नाही. गौरीच्या आई-वडिलांना न्याय मिळत नाही. आई-वडिलांचा दावा गंभीर आहे. मारहाण आणि धमक्यांचा आरोप आहे. याबाबत महिला आयोगाने त्वरित पाठपुरावा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी पंकजा मुंडेंना यामध्ये राजकारण करू नये, असा सल्लाही दिला.
धनंजय मुंडे यांच्यावर तगादा
दरम्यान, अंजली दमानियाने धनंजय मुंडे यांच्यावरही तीव्र टीका केली आहे. ‘त्यांचे विधान ऐकून संताप आला. हे थर्ड क्लास व्यक्तिमत्व आहे. एवढं सगळं होऊनही जर त्यांना आठवण येत असेल तर बोलायला शब्द नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.


