Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सरकारचा मोठा निर्णय! डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आता कफ सिरपच्या विक्रीवर बंदी

सरकारचा मोठा निर्णय! डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आता कफ सिरपच्या विक्रीवर बंदी

Cough Syrup Prescription: देशभरात कफ सिरपमुळे उद्भवलेल्या मृत्यूंच्या वाढत्या घटनांनी चिंतेचा विषय निर्माण केला असून, याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कफ सिरप विक्रीसंबंधी मोठा निर्णय लागू केला आहे. आता पुढे देशातील कोणत्याही औषध दुकानात डॉक्टरांचे लिखित प्रिस्क्रिप्शन नसताना कफ सिरप दिले जाणार नाही. औषध सल्लागार समितीच्या 67व्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि जवळच्या भागांत अलीकडेच कफ सिरप घेतल्यानंतर किडनी फेल होऊन किमान 24 मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यासह देशभरात खळबळ उडाली. राजस्थान, गुजरात आणि इतर राज्यांतही अशाच प्रकारच्या घटना नोंदल्या गेल्या. इतकेच नाही, तर परदेशातही भारतीय कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणांनी भारताची जागतिक प्रतिमा धोक्यात आली. वाढत्या धोक्यांचा विचार करून केंद्राने कफ सिरपची ओव्हर-द-काउंटर विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सिरप खरेदी करण्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी अनिवार्य राहणार आहे.

हेही वाचा – चिमुकल्यांच्या मृत्यूचं तांडव काही थांबेना! कफ सिरप प्यायल्याने नागपूरात 18 महिन्याच्या मुलीचा मृत्यू

गेल्या काही वर्षांत उझबेकिस्तान, इंडोनेशिया आणि गांबिया येथे भारतीय कफ सिरपच्या सेवनामुळे 200 हून अधिक मुलांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उझबेकिस्तानमध्ये तर 68 मुलांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात 21 जणांना शिक्षा ठोठावली गेली. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)ही भारतातील काही कंपन्यांच्या भेसळयुक्त उत्पादनांची नोंद केली असून त्यात श्रीसन फार्मास्युटिकल्सचे ‘कोल्ड्रिफ’, रेडनेक्स फार्मास्युटिकल्सचे ‘रेस्पिफ्रेश TR’ आणि शेप फार्माचे ‘रिलाइफ’ या सिरपचा उल्लेख आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!