Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर वृत्त

संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर वृत्त

Santosh Bangar News: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग आला असून अनेक जिल्ह्यांत सकाळपासून मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघातही मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. मात्र मतदान प्रक्रियेच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा गंभीर आरोप उभा राहिला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

मतदान कक्षात काय घडले?

हिंगोली शहरातील मंगळवारी बाजार भागातील मतदान केंद्र क्रमांक 3 येथे सकाळी संतोष बांगर मतदानासाठी पोहोचले. मतदान करताना त्यांनी एका महिला मतदाराला ईव्हीएमसमोर थेट मार्गदर्शन केल्याचे दृश्य व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. त्याचवेळी मतदान केंद्रात “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो” अशा घोषणांचा आवाजही ऐकू येतो. याशिवाय बांगर यांनी मतदान केंद्रात मोबाईल फोन वापरल्याचाही आरोप आहे. मतदान केंद्रात घोषणाबाजी, फोनचा वापर आणि मतदाराला थेट मार्गदर्शन करणे या सर्व क्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांचे सरळ उल्लंघन मानल्या जातात. त्यामुळे या प्रकारावर तात्काळ कारवाईची मागणी होत आहे.

हेही वाचा –Devendra Fadnavis : उद्याची मतमोजणी रद्द, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

निवडणूक अधिकाऱ्यांकडून दखल

व्हायरल फुटेज समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चौकशीला सुरुवात केली आहे. प्राथमिक अहवालातून गोपनीयतेचा भंग झाल्याची पुष्टी झाल्यास आमदार बांगर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईव्हीएम बिघाडामुळे मतदान ठप्प

दरम्यान, कळमनुरी नगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेतही अडथळा निर्माण झाला आहे. उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्र क्रमांक 8 येथे ईव्हीएम मशीनमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे मतदान काही काळ पूर्णतः बंद ठेवावे लागले. अचानक थांबलेल्या मतदानामुळे मतदारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ मशीन बदलण्याची प्रक्रिया सुरू केली असून मतदान लवकरच सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!