Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rashtriya Bal Puraskar 2025 : क्रिकेट विश्वात बिहारच्या लेकाचा डंका ! 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मान

Rashtriya Bal Puraskar 2025 : क्रिकेट विश्वात बिहारच्या लेकाचा डंका ! 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मान

Rashtriya Bal Puraskar 2025 : भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा आणि आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना थक्क करणारा बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला मानाच्या ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीत पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात वैभवला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विजय हजारे करंडक स्पर्धेत बिहारकडून खेळणाऱ्या वैभवने नुकतीच अरुणाचल प्रदेशविरुद्ध ८४ चेंडूत १९० धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. या खेळीत त्याने १६ चौकार आणि १५ उत्तुंग षटकार ठोकले होते. मात्र, मणिपूरविरुद्धच्या पुढील सामन्यात तो खेळू शकला नाही. याचे कारण म्हणजे, त्याच वेळी त्याला राष्ट्रीय बाल पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला उपस्थित राहायचे होते. क्रीडा क्षेत्रातील त्याच्या अतुलनीय योगदानासाठी केंद्र सरकारने त्याची या पुरस्कारासाठी निवड केली होती.

आयपीएलमधील ‘क्रेझ’ आणि आंतरराष्ट्रीय कामगिरी

वैभव सूर्यवंशीने केवळ देशांतर्गत क्रिकेटमध्येच नव्हे, तर आयपीएलमध्येही आपली छाप सोडली आहे. वैभव आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. संघाने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला कायम (Retain) ठेवले आहे. आयपीएल २०२५ मध्ये त्याने ७ सामन्यांत २५२ धावा कुटून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील (Under-19) भारतीय संघातून खेळताना त्याने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

हेही वाचा – Vijay Hazare Trophy 2025: देशांतर्गत क्रिकेटमध्ये जागतिक विक्रम! 50 षटकांत 574 धावा, 14 वर्षांच्या वैभवने मोडला डिव्हिलियर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड

राष्ट्रपतींकडून कौतुक

या सोहळ्यात बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, तुमच्यासारख्या मुलांनी क्रीडा, शौर्य, कला आणि विज्ञानासारख्या विविध क्षेत्रांत आपली विलक्षण प्रतिभा सिद्ध केली आहे. आज सन्मानित होणारे प्रत्येक मूल देशासाठी प्रेरणादायी आहे. हा पुरस्कार सोहळा ‘वीर बाल दिना’च्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु गोविंद सिंह यांच्या साहिबजाद्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून घोषित केला आहे. याच काळात देशातील प्रतिभावान बालकांचा गौरव करण्याची परंपरा जोपासली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!