Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Zilla Parishad Election : काउंटडाऊन सुरू! आज दुपारी 4 वाजता जाहीर होणार जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक

Zilla Parishad Election : काउंटडाऊन सुरू! आज दुपारी 4 वाजता जाहीर होणार जिल्हा परिषद निवडणुकांचे वेळापत्रक

Zilla Parishad Election : महाराष्ट्रातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक तारखांची घोषणा आज (मंगळवार) दुपारी ४ वाजता राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. या घोषणेसोबतच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू होईल.

दुपारी ४ वाजता होणार मोठी घोषणा 

राज्य निवडणूक आयुक्त दुपारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करतील. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच १५ दिवसांची मुदतवाढ दिल्याने, आता संपूर्ण प्रक्रिया १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. आजच्या घोषणेत मतदानाची तारीख आणि मतमोजणीचा दिवस स्पष्ट होईल.

पहिल्या टप्प्यात ‘या’ जिल्ह्यांचा समावेश

ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आहे, अशाच ठिकाणी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. यामध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश आहे:

  • पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली.
  • कोकण: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
  • मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, धाराशिव.

आरक्षणाचा पेच आणि न्यायालयाचा दिलासा

राज्यातील उर्वरित २० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असल्याने, तिथल्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जातील. दरम्यान, ओबीसी आरक्षण आणि बांठिया आयोगाच्या अहवालाबाबत २१ जानेवारी २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या निकालावर पुढील सर्व निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असेल. आयोगाने ३१ जानेवारीच्या डेडलाईनमध्ये वाढ करण्याची विनंती केली होती, जी न्यायालयाने मान्य करत १० फेब्रुवारीपर्यंतची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवून दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!