मुंबई : बॉलिवूडची सौंदर्यवती श्रद्धा कपूर तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. बऱ्याच काळापासून श्रद्धाचे नाव लेखक राहुल मोदीसोबत जोडले जात आहे. ते दोघेही त्यांच्या लग्नाच्या चर्चेमुळे नेहमीच प्रसिद्धी झोतात असतात. चाहतेही श्रद्धाला वधूच्या कपड्यांत पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता तिची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांनी श्रद्धाच्या लग्नावर मौन सोडले आहे.
श्रद्धा कपूरची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांनी अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल भाष्य केले. खरंच? मला याबद्दल काहीच माहीत नाही. मला काहीच कल्पना नाही. श्रद्धा तिच्या कुटुंबाचा वारसा पुढे नेल्याचा त्यांना अभिमान आहे. श्रद्धाने ज्या सहजतेने कुटुंबाच्या नावाला गौरव मिळवून दिला आहे, त्यामुळे त्या खूप आनंदी आहेत, असे त्या म्हणाल्या. तेजस्विनी कोल्हापुरे यांनी हे देखील उघड केले की, त्या आणि श्रद्धा एकमेकींच्या कामावर चर्चा करतात. त्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या सेटवरील फोटो, व्हिडिओ आणि लूक्स एकमेकींना पाठवतात. तेजस्विनी यांनी हे देखील उघड केले की, जेव्हा त्यांना वाटते की एखाद्या गोष्टीत खरोखरच सुधारणा करता येईल, तेव्हाच त्या आणि श्रद्धा एकमेकींना सल्ला देतात.
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, २०२४ पासून त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या आहेत, जेव्हा ते एका डिनर डेटवर एकत्र दिसले होते. ते सुट्ट्यांमध्ये आणि विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. जरी श्रद्धा आणि राहुलने त्यांच्या नात्याला कधीही अधिकृतपणे दुजोरा दिला नसला तरी, त्यांची केमिस्ट्री चर्चेचा विषय राहिली आहे. चाहते आता त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


