Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bhandara Accident : लग्नाहून परतताना भीषण अपघात; वऱ्हाड्यांच्या गाडीचा चुराडा, ५ जण ठार

Bhandara Accident : लग्नाहून परतताना भीषण अपघात; वऱ्हाड्यांच्या गाडीचा चुराडा, ५ जण ठार

Bhandara Accident News : भंडारा जिल्ह्यात लग्न आटोपून परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला घातला आहे. पवनी तालुक्यातील सौंदड परिसरात झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ४ महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अड्याळ येथील वऱ्हाडी कोंढा येथून विवाह सोहळा आटोपून परतत होते. त्यावेळी त्यांच्या व्हॅनचा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या ट्रेलरवर ती जोरात आदळली. या भीषण धडकेत वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.

अपघातावेळी वाहनात एकूण ९ जण प्रवास करत होते. त्यापैकी ५ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी भंडाऱ्यात हलविण्यात आले आहे, तर अन्य दोघांवर अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!