Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या…’; उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केल्या ‘या’ 2 मागण्या

‘शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या…’; उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केल्या ‘या’ 2 मागण्या

मुंबई: मराठवाड्यातील शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीचे गंभीर चित्र मांडले आहे. त्यांनी सांगितले की यंदाची आपत्ती भयानक असून अजूनही अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. या संकटामुळे केवळ शेतकऱ्यांचा नव्हे तर सर्वसामान्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचे प्रचंड ओझे असून, त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने मदत करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जमीन पुन्हा उत्पादनक्षम करण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षे लागतील, त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची गरज आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित केले.

सरसकट कर्जमाफी करा –

उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी सरसकट कर्जमाफीची मागणी केली. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या शेतात काहीच उरलेले नाही, त्यामुळे सरकारने प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत द्यावी. तसेच, व्याज देणाऱ्या वित्तीय कंपन्यांनी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवू नयेत, यासाठी सरकारने आदेश जारी करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – ‘देणं हे मनाच्या श्रीमंतीवर अवलंबून असतं, खिशाच्या नव्हे; पुण्यातील भाजी विक्रेत्याकडून राज्यातील पूरग्रस्तांना एका लाखाची मदत

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बिहारच्या उदाहरणाचा उल्लेख करत सरकारवर टीका केली. बिहारमधील 75 लाख महिलांच्या खात्यात 10,000 रुपये जमा करता, पण महाराष्ट्राने तुम्हाला कठीण काळात साथ दिली तेव्हा इथल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार का? असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. याशिवाय, त्यांनी बँकांकडून शेतकऱ्यांना जाणाऱ्या नोटिसा थांबवण्याचीही मागणी केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!