Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! सासू, नणंद आणि निलेश चव्हाणचा जामीन अर्ज फेटाळला

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट! सासू, नणंद आणि निलेश चव्हाणचा जामीन अर्ज फेटाळला

Vaishnavi Hagawane Murder Case: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे. वैष्णवीच्या सासू, नणंद आणि पतीच्या मित्राने दाखल केलेला जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. नऊ महिन्यांच्या बाळाची आई कोणत्याही दबावाशिवाय आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही, असे स्पष्ट करत कोर्टाने तिघांना जामीन नाकारला.

काय आहे नेमकं प्रकरण?

वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. तपासादरम्यान हगवणे कुटुंबीयांचे राजकीय संबंध, पोलिसांवरील प्रभाव आणि कौटुंबिक हिंसाचाराची पार्श्वभूमीही समोर आली. यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे यांचा मुलगा सुशील हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि पतीचा मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली होती.

लग्नात21 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि कार्यालयात नोकरी देण्याचे मान्य करूनही वैष्णवीला लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून छळाला सामोरे जावे लागले. चार-पाच महिन्यांत पुन्हा चांदीच्या भांड्यांची मागणी करण्यात आली. इतकेच नव्हे तर गर्भवती असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केल्याचाही आरोप तिच्या पालकांनी केला आहे.

कोर्टाने सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, नऊ महिन्यांच्या बाळाची आई दबावाशिवाय असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही. हुंडाबळी हा समाजावरचा मोठा कलंक आहे. आरोपींवर आत्महत्येला प्रवृत्त करणे, कट कारस्थान रचणे, पुरावे नष्ट करणे आणि आरोपींना लपवण्याचे गंभीर आरोप आहेत. म्हणूनच आरोपींना जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो किंवा पुरावे नष्ट होऊ शकतात. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपी तुरुंगातच राहणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!