मुंबई : रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’मध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. सुरुवातीला हा रिअॅलिटी शो कंटाळवाणा वाटत होता. मात्र, सीझनच्या मध्यात तो मनोरंजक बनला आहे. शो चांगला परफॉर्म करत असल्याने त्याचा टीआरपी देखील वाढला आहे. परिणामी, हा शो आणखी एक महिना वाढवला जाईल, असे म्हटले जात आहे.
‘बिग बॉस शो’चा अंतिम भाग पुढे ढकलण्यात येणार असून, हा शो चार आठवड्यांनी पुढे ढकलण्यात येणार आहे. त्यामुळे हा शो तुम्हाला आणखी एक महिना पाहता येईल, अशी चर्चा आहे. ‘बिग बॉस १९’चा अंतिम भाग मूळतः ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार होता. जर मुदतवाढीची माहिती खरी ठरली तर शो जानेवारी २०२६ मध्ये संपेल, असे म्हटले जात आहे. दरम्यान, निर्माते आणि कलर्स वाहिनीने बिग बॉसच्या अंतिम तारखेच्या पुढे ढकलण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती उघड केलेली नाही.
शो सुरू होऊन जवळजवळ दोन महिने झाले आहेत. स्पर्धकांच्या खऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. फरहाना भट्ट या शोवर वर्चस्व गाजवताना दिसत आहे. टीव्ही स्टार गौरव खन्नाही सुधारला आहे. सुरुवातीच्या महिन्यांत बॅकफूटवर असणारा गौरव आता समोरून आक्रमकपणे आपली भूमिका घेत आहे. आता या शोची सगळीकडे चर्चा सुरु आहे.


