Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Flood: राज्यातील सर्व पिकांची 100 टक्के पाहणी होणार; चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Maharashtra Flood: राज्यातील सर्व पिकांची 100 टक्के पाहणी होणार; चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Maharashtra Flood: महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीची 100 टक्के पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. 1 ते 31 ऑक्टोबरदरम्यान ही पाहणी होणार आहे.

ई-केवायसीची अट शिथिल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, मदत मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसीची अट रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी अॅग्रीस्टॅक नोंदणीला मदतीचा आधार मानले जाईल. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रक्रियात्मक अडथळे न येता थेट मदत मिळू शकेल. पुढील आठवड्यात नुकसानग्रस्तांसाठी मदत जाहीर केली जाणार असून, दोन ते तीन दिवसांत संपूर्ण तपशील स्पष्ट होईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

हेही वाचा – पूरग्रस्त शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! ऊस उत्पादकांना FRP कपातीचा फटका, राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

शेतकाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळेल दिलासा

राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम थेट जमा केली जाईल. दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांच्या हाती पोहोचेल, ज्यामुळे सणासुदीच्या काळात त्यांना आर्थिक आधार मिळेल. शेतकऱ्यांना कोणतीही अतिरिक्त धावपळ करावी लागणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- सरकारची मोठी घोषणा! ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार

ओला दुष्काळ संकल्पनेवर नवा निर्णय

दरम्यान, पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले, मॅन्युअलमध्ये ‘ओला दुष्काळ’ अशी संकल्पना नसली तरी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून सरकारने ती प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळी भागात जशा सवलती शेतकऱ्यांना दिल्या जातात, त्या आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही लागू होणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!