Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबई आंदोलनानंतर आता मनोज जरांगे पाटीलांनी दिला ‘चलो दिल्ली’चा नारा

मुंबई आंदोलनानंतर आता मनोज जरांगे पाटीलांनी दिला ‘चलो दिल्ली’चा नारा

पुणे: मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सुरू केलेल्या संघर्षात मुंबईत झालेल्या आंदोलक मोहिमेला यश मिळाले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर जारी केला आहे. हा निर्णय मराठा समाजासाठी मोठ्या विजयासमान मानला जात आहे.

यावर्षी पुढील टप्प्यात सातारा गॅझेट लागू होण्याची शक्यता आहे. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. मराठा समाजाचे वादळ आता दिल्लीमध्ये धडकणार आहे. त्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला असून, देशभरातील मराठा समाजाचे प्रतिनिधी लवकरच दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार आहेत. अधिवेशनाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. ही घोषणा धाराशिव येथे हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी केली.

हेही वाचा – शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; गोपीचंद पडळकरांचा जोरदार हल्लाबोल

दरम्यान, मुंबईतील आंदोलनापूर्वी त्यांनी उपोषणाची सुरुवात केली होती, ज्यामध्ये लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते. आंदोलनाच्या यशानंतर सरकारने काही मागण्या मान्य केल्या तर काही मागण्यांसाठी वेळ मागितला आहे. मराठा समाजाची मुख्य मागणी, म्हणजे राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करणे, सरकारने आता ही मागणी मंजूर केली आहे.

हेही वाचा – बीडकरांचं स्वप्न पूर्ण झालं! बीड रेल्वे सेवेला आज हिरवा झेंडा

मराठा – ओबीसी संघर्ष

हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर जारी झाल्यानंतर राज्यातील ओबीसी समाजाने विरोधाची भूमिका घेतली आहे. ओबीसी समाजाचा दावा आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही त्यांच्यासमोर अन्यायकारक ठरेल. याशिवाय, बंजारा समाज आणि आदिवासी समाज देखील या गॅझेटवरून विरोधात आले आहेत. बंजारा समाजाचे प्रतिनिधी म्हणतात की, त्यांना एसटीमध्ये समावेश करावा. मराठा समाजासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर आता दिल्लीमध्ये होणारे अधिवेशन हे आरक्षणाच्या लढ्याचा पुढचा टप्पा ठरणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!