Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vaishno Devi Temple: वैष्णोदेवी मंदिरात वर्षातील पहिली बर्फवृष्टी; पाहा मनमोहक फोटोज

Vaishno Devi Temple: वैष्णोदेवी मंदिरात वर्षातील पहिली बर्फवृष्टी; पाहा मनमोहक फोटोज

Vaishno Devi Temple: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जम्मू-काश्मीरमधील पर्यटन स्थळांनी पांढरा शुभ्र साज परिधान केला आहे. रियासी जिल्ह्यातील प्रसिद्ध माता वैष्णोदेवी मंदिरात यंदाच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली असून, त्रिकुटा पर्वत रांगा बर्फाच्या चादरीने न्हाऊन निघाल्या आहेत. या मनमोहक दृश्यामुळे तीर्थक्षेत्राचा परिसर अत्यंत विलोभनीय दिसत आहे.

पर्यटन स्थळांवर बर्फाचा थर

केवळ वैष्णोदेवीच नव्हे, तर भादरवाह खोरे, पटनीटॉप, नाथाटॉप, सनासर आणि बटोटे यांसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांवरही जोरदार हिमवृष्टी झाली आहे. शुक्रवारी सकाळी नागरिक जागे झाले तेव्हा चहूबाजूंनी पसरलेला बर्फ पाहून त्यांना सुखद धक्का बसला. या बर्फवृष्टीमुळे पर्यटनावर आधारित व्यवसाय करणाऱ्या हॉटेल मालक, टॅक्सी चालक आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या आशा उंचावल्या असून त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.

आरोग्य आणि शेतीसाठी ‘वरदान’

हवामान तज्ज्ञांच्या मते, ही बर्फवृष्टी आणि पाऊस पर्यावरणासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. बर्फवृष्टीमुळे हवेतील धूळ आणि प्रदूषण कमी झाल्याने नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा होईल. तसेच भूजल पातळी वाढल्याने कोरडे पडलेले नैसर्गिक झरे आणि विहिरी पुन्हा प्रवाहित होतील.फळबागा आणि भाजीपाला उत्पादनासाठी ही बर्फवृष्टी पोषक असून, यामुळे भविष्यातील वीज टंचाईवर मात करण्यासही मदत होईल.

दरम्यान, निसर्गाचे हे रूप सौंदर्यासोबतच काही अडचणीही घेऊन आले आहे. काश्मीर खोऱ्यातील मुसळधार हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार बर्फामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला असून रस्ते बर्फाखाली गाडले गेले आहेत. खराब हवामानामुळे श्रीनगर विमानतळावरील २६ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अनंतनाग आणि पूंछ भागात जोरदार वाऱ्यासह झालेल्या हिमवृष्टीमुळे वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. पूंछमध्ये बर्फात एक बस अडकल्याचीही माहिती समोर आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!