Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mangalprabhat Lodha: ‘जनतेची सेवा करणं गुन्हा आहे का?’ मलबार हिलमधील गॅस सिलेंडर वादावर मंगलप्रभात लोढांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

Mangalprabhat Lodha: ‘जनतेची सेवा करणं गुन्हा आहे का?’ मलबार हिलमधील गॅस सिलेंडर वादावर मंगलप्रभात लोढांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

Mangalprabhat Lodha: मलबार हिलमधील जैन मंदिरांना सणासुदीसाठी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादावर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अखेर मौन सोडले आहे. “लोक मदतीसाठी माझ्याकडे आले आणि मी त्यांना सिलेंडर मिळवून देण्याचा प्रयत्न केला, तर त्यात माझे काय चुकले?” असा आर्त सवाल त्यांनी विरोधकांना विचारला आहे.

नेमका वाद काय?
मंत्री लोढा यांनी मलबार हिलमधील १६ जैन मंदिरांच्या उत्सवासाठी प्रत्येकी ५ गॅस सिलेंडर देण्याची शिफारस करणारे पत्र प्रशासनाला दिले होते. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर ‘विशिष्ट धर्माची बाजू’ घेतल्याचा आरोप करत टीकेची झोड उठवली होती. विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेत गॅस एजन्सींना पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता.

लोढांचा ‘व्हिडीओ’मधून पलटवार
विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी लोढा यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.हिंदू सण किंवा धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी टीका करणे ही आता एक फॅशन झाली आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. माझ्या मतदारसंघात रामनवमी, साई भंडारा आणि जैन धर्मीयांचे मोठे कार्यक्रम असतात. अशा वेळी गॅसचा तुटवडा भासू नये म्हणून प्रयत्न करणे ही माझी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे. लोढा पुढे म्हणाले की, “पुढच्या महिन्यात हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. या कार्यक्रमांसाठीही मला विशेष प्रयत्न करावेच लागणार आहेत. कुणाला वाद निर्माण करायचा असेल तर त्यांनी खुशाल करावा, मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही.”

राज्यात गॅसचा तुटवडा नाही
लोढा यांनी स्पष्ट केले की, राज्यामध्ये गॅसचा कोणताही तुटवडा नाही आणि सरकार उत्तम काम करत आहे. केवळ मोठ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी एकाच वेळी जास्त सिलेंडरची गरज भासते, त्यासाठीच हा पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले. “विनाकारण समाजात तेढ निर्माण करू नका,” असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!