Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Navnath Waghmare On Suresh Dhas: ‘आष्टीचा जब्या’ उल्लेख करत नवनाथ वाघमारेंची सुरेस धसांवर टीका

Navnath Waghmare On Suresh Dhas: ‘आष्टीचा जब्या’ उल्लेख करत नवनाथ वाघमारेंची सुरेस धसांवर टीका

बीड: ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी बीडमधील केज परिसरात आयोजित मोर्चा संबोधित करत ओबीसी समाजाला महत्त्वपूर्ण संदेश दिला. वाघमारे म्हणाले की, ‘जर आमचा ग्रामपंचायत सदस्य चालत नसेल तर आम्हालाही यांचा आमदार चालणार नाही. त्यामुळे यापुढे ओबीसींनी फक्त ओबीसींनाच मतदान करावे.’ मोर्चादरम्यान वाघमारे यांनी भाजपचे आमदार सुरेश धसांवरही टीका केली. त्यांनी सांगितले की, ‘आष्टीचा जब्या विधानसभेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडे परत जाईल. त्याचा निवडणुकीत कार्यक्रम करू,’ असा इशाराही वाघमारे यांनी दिला आहे.

शरद पवारांवरही टीका

वाघमारे यांनी शरद पवारांच्या धोरणांवरही सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, ‘मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणाला आम्ही कधीही विरोध केला नाही, पण बारामतीच्या करामतींमुळे ओबीसींना अडचणींचा सामना करावा लागला. आता ‘करो व मरो’ची परिस्थिती आहे. आमचे ओबीसी आरक्षण खायला आले म्हणजे आमच्याही अधिकारांवर परिणाम झाला.’

सुरेश धसांवर टीका

दरम्यान, वाघमारे म्हणाले की, ‘मनोज जरांगे, छगन भुजबळ आणि पंकजा ताईंवर बोलतोय, पण त्याची लायकी आहे का? आष्टीच्या जब्याला पुन्हा पंकजा ताईं आणि धनंजय मुंडेंकडे येईल. निजामाच्या विचाराच्या लोकांना आता मतदान करायचे नाही. याने जर थोडी दाढी वाढवली तर हा निजामासारखा दिसेल. याला निजामी गॅझेट नुसार आरक्षण पाहिजे.’

निझाम गॅझेटवर सवाल

तथापी, वाघमारे यांनी निझाम गॅझेटवरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, सरकारला संविधान मान्य नसल्यास हैदराबाद गॅझेट कसे लागू करू शकते? धनगर आणि बंजारा समाजाने अनेक वर्षे आंदोलन केले, त्यावेळी हे गॅझेट कधी लागू झाले नाही. आपण छत्रपतींच्या विचारांचे वारस आहोत. हे निजामाकडे कशाला गेले होते?

दलित, मुस्लिम आणि ओबीसींनी एकत्र येणे गरजेचे

नववाथ वाघमारे यांनी म्हटलं की, मनोज जरांगेच्या व्यासपीठावर पाठिंबा देणे फक्त काही लोकांचे काम असू नये. दलित, मुस्लिम आणि ओबीसींनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. पंकजा मुंडे यांनी दोन वर्षांत प्रमाणपत्रांचे वितरण केले, त्याची चौकशी करावी. आमच्या आंदोलनाला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा पाठिंबा आहे, असंही वाघमारे यांनी यावेळी नमूद केलं.

दसऱ्यानंतर मुंबईकडे जाण्याचा इशारा

दसऱ्यानंतर सर्वांशी चर्चा करून मुंबईकडे जाण्याचा इशाराही यावेळी नवनाथ वाघमारे यांनी दिला. त्यांनी स्पष्ट केले की, ओबीसी समाज जर मुंबईत गेला, तर राज्य सरकारला झुंडशाहीची खरी ताकद समजेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!