सध्याच्या जीवनात सर्वच धार्मिक विधी करण्यास जमत नाही. पण, काही लोक अगदी प्रेम आणि भक्तिभावाने विधींचे पालन करतात. त्यातच अनेक लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतात. व्रत किंवा उपवास हा एक सोपा आणि जलद उपाय म्हणून पाहिला जातो.
व्रत ठेवल्याने शरीर डिटॉक्स होते आणि वजन पटकन कमी होते, असा काहींचा समज आहे. मात्र, वजन कमी होण्याचा मुख्य आधार म्हणजे शरीरात घेतल्या जाणाऱ्या कॅलरीपेक्षा कमी कॅलरी वापरणे. म्हणजेच, आपण जितक्या कॅलरी घेतो त्यापेक्षा जास्त खर्च केल्यास वजन कमी होऊ शकते. व्रतामुळे थेट वजन कमी होत नाही, तर त्या काळात कमी खाल्ल्यामुळे कॅलरी कमी होतात, त्यामुळे वजन तात्पुरते घटते. हा मात्र, परिणाम कायमस्वरूपी नसतो. अनेक वेळा व्रत संपल्यानंतर लोक पुन्हा नेहमीसारखं खायला लागतात, तेव्हा वजन परत वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे व्रताला वजन कमी करण्याचा कायमचा उपाय मानणं चुकीचं ठरू शकतं.
व्रताच्या काळात योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचं असतं. पुरेसं पाणी पिणं, प्रथिने आणि फायबरयुक्त अन्न घेणं गरजेचं आहे. जर शरीराला आवश्यक पोषण मिळालं नाही, तर थकवा, अशक्तपणा आणि स्नायूंची ताकद कमी होऊ शकते. त्यामुळे व्रत करताना संतुलित आहार घेणं आवश्यक आहे.


