Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

MLC Elections 2026: महाराष्ट्राला मिळणार 26 नवे आमदार; विधान परिषदेचं बिगुल वाजणार

MLC Elections 2026: महाराष्ट्राला मिळणार 26 नवे आमदार; विधान परिषदेचं बिगुल वाजणार

MLC Elections 2026: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सत्तासंघर्षाचा नवा अंक आता विधान परिषदेच्या रिंगणात रंगणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या २६ जागांसाठी लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजणार असून, राज्याला २६ नवीन आमदार मिळणार आहेत. यामध्ये विधानसभा सदस्यांद्वारे निवडून येणाऱ्या ९ जागा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित १७ जागांचा समावेश आहे. या निवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

९ दिग्गज आमदारांची निवृत्ती आणि महायुती विरुद्ध मविआ चुरस
येत्या १३ मे २०२६ रोजी विधान परिषदेतील ९ महत्त्वाच्या सदस्यांची मुदत संपत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या जागांचा समावेश आहे. सध्याच्या विधानसभा सदस्यांच्या संख्याबळाचा विचार करता, भाजपच्या वाट्याला ५ जागा सहज मिळण्याची चिन्हे आहेत, तर शिवसेना २ आणि राष्ट्रवादी १ जागा जिंकू शकते. मात्र, महायुतीकडे असलेली जादा मते आणि महाविकास आघाडीची रणनीती पाहता, ही निवडणूक बिनविरोध न होता अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा ‘वनवास’ संपणार: १७ जागांवर मतदान
गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांवर अखेर निवडणुकीचे सावट आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका न झाल्याने या जागा रिक्त होत्या. मात्र, निवडणूक आयोगाच्या ‘७५ टक्के मतदार’ या नवीन निकषामुळे आता या जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये पुणे, सोलापूर, नाशिक, नागपूर, ठाणे आणि छत्रपती संभाजी नगर यांसारख्या प्रमुख जिल्ह्यांचा समावेश असून, या जागा जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

निवडणूक कार्यक्रम आणि राजकीय रणनीती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोग पुढील आठवड्यात या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. या जागांवर निवडून येणाऱ्या सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै २०३० पर्यंत असणार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आपले वर्चस्व राखण्यासाठी महायुतीने विशेष मोर्चेबांधणी केली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही जागा खेचून आणण्यासाठी गुप्त बैठकांचे सत्र सुरू केले आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष आता आयोगाच्या अधिकृत घोषणेकडे लागले असून, या निवडणुकीत ‘फोडाफोडीचे राजकारण’ की ‘एकीचे बळ’ यशस्वी ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!