मुंबई: राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे राज्य सरकार परत घेणार असल्याची टीका विरोधक करत आहेत. अशातचआता महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत खुलासा केला आहे. अपात्र बहिणींचे पैसे परत घेणार नाही. पण अपात्र ठरलेल्या बहिणांना यापुढे या योजनेचा लाभ घेत येणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
तसेच आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणांना त्यांचे कागदपत्र जाऊन मागितले नाहीत किंवा पडताळणीसाठी त्यांच्या घरी गेलो नाही. ज्या भागातून तक्रारी आल्या तिथेच फेरतपासणी करण्यात आली. कुठेही सरसकट फेरतपासणी झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
ज्या लाडक्या बहिणी फेरतपासणीत अपात्र पात्र ठरल्या, त्यांच्याकडून कोणतेही पैसे परत घेतले जाणार नाहीत. त्यांचे अर्ज बाद होणार असून त्यांना या पुढच्या योजनेचा लाभ मिळणार नाही. अनेक महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरले होते. छाननीचे म्हणाल, तर प्रत्येक सरकारी योजनेत दोन-तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी छाननी होत असते, असं देखील तटकरे यांनी म्हटले.


