Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नितीशकुमारांसोबत दगाफटका ? मणिपूरमध्ये भाजपचा पाठिंबा काढून घेणाऱ्या प्रदेशाध्यक्षाला दिला नारळ

नितीशकुमारांसोबत दगाफटका ? मणिपूरमध्ये भाजपचा पाठिंबा काढून घेणाऱ्या प्रदेशाध्यक्षाला दिला नारळ

पाटणा: जदयूने मणिपूरमध्ये एनडीएचा पाठिंबा काढून घेण्याचे राज्यपालांना पत्र देणाऱ्या प्रदेशाध्यक्षांनाच नारळ दिला आहे. मणिपूरचे जदयू प्रदेशाध्यक्ष वीरेंद्रसिंह यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. या पत्रात त्यांनी बीरेनसिंह यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले होते. २०२२ पासून जेडीयू आणि भाजपची युती होती.

जेडीयूच्या ६ पैकी ५ आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याने मणिपूरमध्ये भाजप सरकारचे संख्याबळ वाढले होते. या आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने तसा भाजप सरकारला काहीही फरक पडणार नव्हता. परंतु, बिहार निवडणूक तोंडावर असल्याने व केंद्रात नितीशकुमारांचा टेकू असल्याने या संबंधांवर त्याचा विपरीत परिणाम होणार होता. बिहारमध्ये यावर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. अशावेळी नितीशकुमार यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय भाजपवर दबावाचे तंत्र वापरण्यासाठी घेतला गेला का अशीही चर्चा सुरू झाली होती.

परंतु, या पाठिंबा काढून घेण्याच्या निर्णयाला नितीशकुमारांची संमती नव्हती हे आता समोर येत आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये नितीशकुमारांच्या जेडीयूचे ५ आमदार भाजपमध्ये सहभागी झाले होते. त्याआधी अरुणाचल प्रदेशातही जेडीयूचा एकमेव आमदार भाजपमध्ये गेला होता. मणिपूरमध्ये जेडीयूकडे एकमेव आमदार राहिला होता, तोदेखील आता विरोधी बाकावर बसणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!