Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह ३० जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा

Maharashtra Rain : मुंबई, पुण्यासह ३० जिल्ह्यांना यलो अलर्ट; वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा

Maharashtra Rain : उकाड्याने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून हवामान विभागाने आज राज्यातील ३० जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ, बीड, परभणी, लातूर, धाराशीव, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, मान्सूनने पूर्वोत्तर भारतातील सर्व राज्ये, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातही मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण तयार झाले असून येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील आणखी काही भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!