Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अमरावतीध्ये नवरदेवावर स्टेजवर हल्ला; ड्रोनमध्ये कैद झाला फिल्मी स्टाईल हल्याचा थरार

अमरावतीध्ये नवरदेवावर स्टेजवर हल्ला; ड्रोनमध्ये कैद झाला फिल्मी स्टाईल हल्याचा थरार

अमरावती: शहरात घडलेली एक धक्कादायक घटना चर्चेचा विषय ठरत आहे. बडनेरा रोडवरील साहिल लॉन येथे सुरू असलेल्या एका विवाह सोहळ्यात चक्क नवरदेवावरच जीवघेणा हल्ला झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. साधारण पाहुण्यांचा रुसवा-फुगवा वा गोंधळ हे लग्नकार्यांत नेहमीच दिसून येते, मात्र येथे गोष्ट थेट रक्तरंजित वळणावर गेली.

दरम्यान, मंगळवारी रात्री बडनेरातील सुजल समुद्रे यांच्या विवाह सोहळ्यात दोन युवकांनी अचानक स्टेजवर चढून सुजल याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यानंतर नवरदेव गंभीर जखमी झाला, तर नववधू आणि नवरदेवाची आई धक्क्याने बेशुद्ध पडल्या. संपूर्ण प्रकार ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाला असून या व्हिडिओमुळे घटनेचा थरार स्पष्ट झाला आहे.

हेही वाचा –आईच्या मृत्यूनंतर राग अनावर! रुग्णाच्या नातलगाचा कूपर रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला

हल्ल्यानंतर आरोपी दोघेही घटनास्थळावरून दुचाकीवर बसून फरार झाले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांनी केला असता, त्यांच्यावरही चाकूने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

या घटनेत जखमी झालेल्या सुजल समुद्रे यांना उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असले तरी कुटुंब अजूनही दहशतीच्या सावटाखाली आहे. परिणामी विवाह सोहळा अर्धवट ठेवून थांबवावा लागला. नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचा बडनेरातील दोन युवकांसोबत वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी लग्नात येऊन गोंधळ घालण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी आरोपींना तातडीने पकडून कठोर कारवाई करावी, तोपर्यंत आम्ही सुरक्षित नाही, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे शहरात तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!