Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महामंडळाचा इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्यात! एसटी कर्मचारी काँग्रेसचा दावा; एक किलो मीटरला सरासरी २० रुपयांचे नुकसान

महामंडळाचा इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्यात! एसटी कर्मचारी काँग्रेसचा दावा; एक किलो मीटरला सरासरी २० रुपयांचे नुकसान

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी बस) इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्यात असल्याचा धक्कादायक दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आला. इलेक्ट्रिक बस प्रकल्पात एसटीचे सरासरी एका किलोमीटर मागे २० रुपये इतके नुकसान होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस प्रकल्पाअंतर्गत एकूण १६८ बस सुरू आहेत. भविष्यात येणाऱ्या एकूण ५ हजार १५० बस पूर्णपणे एसटीच्या ताफ़्यात दाखल झाल्या व करारात ठरल्याप्रमाणे या प्रकल्पातील बस मार्गावर चालल्या नाहीत. तरी त्यांना प्रतीदिवस प्रतिबस ठरलेली ३२५ किलोमीटरची हमी रक्कम द्यावी लागेल. दरम्यान, ५ हजार १५० बसेस सरासरी १५.४५ लाख किमी अंतर चालल्या किंवा नाही चालल्या तरी किमान प्रतिदिवस प्रतिवस प्रती कि.मी. २० रुपये इतका तोटा होऊन सुमारे ३ कोटी २५ लाख रुपये इतका खर्च होईल आणि तेवढाच तोटा सहन करावा लागणार आहे.

भाडेतत्वावरील बस कंत्राटात हेराफेरी

एसटीच्या ताफ्यात नव्याने येणाऱ्या १ हजार ३१० भाडेतत्वावरील बस कंत्राटाच्या निविदेत हेराफेरी झाली व ऐनवेळी नियम व अटी विशिष्ट कंत्राटदारांना फायद्याच्या ठरतील, अशाच पद्धतीने टाकण्यात आल्याने शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे महामंडळाचे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप करून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारच्या परिवहन मंत्रालयाला दिले आहेत. आता इलेक्ट्रिक बस प्रकल्पाचे नुकसान टाळण्यासाठी चौकशी करावी, अशी मागणी बरगे यांनी केली.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!