Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘संसद नाटकाचे व्यासपीठ नाही’; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

‘संसद नाटकाचे व्यासपीठ नाही’; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

Winter Session 2025: लोकसभा हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना स्पष्ट संदेश दिला आहे. ‘पराभवाची निराशा झटकून द्या आणि धोरणाधारित चर्चा करा,’ असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला. संसद भवनात माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी सांगितले की, हे अधिवेशन देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी आहे, नकारात्मक भावना व्यक्त करण्यासाठी नाही.

येथे नाटक नाही, तर धोरणांवर चर्चा व्हावी

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘ज्याला नाटक करायचे आहे तो ते करू शकतो. पण येथे नाटक, घोषणा किंवा गदारोळासाठी मैदान नाही. धोरणांवर, मुद्द्यांवर आणि देशाच्या प्रगतीवर भर दिला पाहिजे.’ त्यांनी अधिवेशनाच्या उद्दिष्टांवर भर देत सांगितले की संसद देशाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेते, त्यामुळे प्रत्येक पक्षाने सकारात्मक आणि विषयाधारित भूमिका मांडावी.

हेही वाचा – पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण थेट दिल्लीत पोहचले, काँग्रेस खासदाराचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

लोकशाही आणि अर्थव्यवस्था भारताची दुहेरी ताकद

हिवाळी अधिवेशनाआधीच्या संबोधनात मोदी म्हणाले की, भारत जगासमोर लोकशाहीचे आदर्श उदाहरण ठरत आहे. बिहार निवडणुकीतील मतदारांची उपस्थिती ही लोकशाहीची शक्ती दर्शवते. एकीकडे आपली लोकशाही मजबूत होत आहे आणि दुसरीकडे अर्थव्यवस्था नव्या उंचीवर पोहोचत आहे. जगाचे लक्ष भारताकडे आहे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी भारताचा वेगाने वाढणारा आर्थिक विकास ‘विकसित भारत’ या उद्दिष्टाकडे नेणारा निर्णायक टप्पा असल्याचेही स्पष्ट केले.

विरोधी पक्षांनी जबाबदारी पार पाडावी

विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करताना मोदी म्हणाले की काही पक्ष पराभव पचवू शकत नाहीत आणि त्याची निराशा ते सभागृहात व्यक्त करतात. हिवाळी अधिवेशन हे पराभवाचे रणांगण बनू देऊ नका आणि विजयाचा अहंकारही दाखवू नका. लोकप्रतिनिधी म्हणून आपण मुद्दे मांडले पाहिजेत, असेही ते म्हणाले. तथापी, सभागृहातील तरुण खासदारांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, पहिल्यांदा निवडून आलेले किंवा तरुण खासदार खूप उत्साही आहेत. परंतु त्यांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली जात नाही. पक्ष कोणताही असो, नवीन पिढीला मंच मिळायला हवा. त्यांच्या अनुभवांमुळे सभागृहाचे काम अधिक समृद्ध होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!