Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लव्ह मॅरेज आहे का…? अजितदादांचा नगराध्यक्ष पदाच्या महिला उमेदवाराला विनोदी सवाल

लव्ह मॅरेज आहे का…? अजितदादांचा नगराध्यक्ष पदाच्या महिला उमेदवाराला विनोदी सवाल

Ajit Pawar Speech: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी केवळ काहीच दिवस उरले असून, दोन डिसेंबरच्या मतदानाआधी प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सर्वच पक्षांचे नेते आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी आक्रमक पवित्रा घेत आहेत. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार मोर्चेबांधणी करत असून, मंचर नगर परिषदेतील महायुतीच्या सभेत त्यांचं भाषण खास चर्चेचा विषय ठरलं. मंचर नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून मोनिका बाणखेले मैदानात आहेत. त्यांच्या समर्थनार्थ अजित पवारांची सभा झाली. यावेळी पवारांनी त्यांच्या खास विनोदी शैलीत केलेल्या एका प्रश्नामुळे संपूर्ण सभेत एकच हशा पिकला.

सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, “मोनिका बाणखेले… पूर्वी मोनिका बेंड! माहेरही मंचरमध्ये आणि सासरही इथेच! मग सांगायला हरकत नाही… लव्ह मॅरेज आहे का?” त्यांच्या या प्रश्नाने क्षणभर सभेत हशा पिकला. लगेचच अजित पवारांनी हसतच स्पष्टीकरण दिले की, “सासर–माहेर जवळ असलं की लोक शंका घेतात म्हणून गंमतीने विचारलं!”सभेमध्ये उपस्थित सर्वजण या संवादाने अक्षरशः खदखदून हसले.

हेही वाचा – पुण्याचा पालकमंत्री म्हणून माझी मलाच लाज वाटली; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

महायुतीतील संघर्ष पुन्हा चर्चेत

मंचर नगरपरिषदेच्या लढतीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र असले तरी त्यांच्यापुढे एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी संपूर्ण भाषणात एकनाथ शिंदे यांचं नाव टाळलं, ज्यावरून महायुतीतील दुरावा पुन्हा अधोरेखित झाला आहे. अजित पवार म्हणाले, “मंचरचा विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून मी, दिलीप वळसे पाटील, शिवाजी आढळराव पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद हे करू शकतात.” त्यांच्या या विधानात शिंदे गटाचा उल्लेख नसल्यामुळे राजकीय वर्तुळात या सभेची विशेष चर्चा सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!