Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे जिल्हा परिषदेच्या गट आणि गण रचनेबाबत स्पष्टता नाही

पुणे जिल्हा परिषदेच्या गट आणि गण रचनेबाबत स्पष्टता नाही

पुणे : जिल्हा परिषदेचा २०२२ मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर नव्याने गटरचना करून आरक्षणही जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता ही सर्व प्रक्रिया पुन्हा नव्याने होणार असल्याची शक्यता आहे. राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली होती.

जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर राज्य शासनाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट आणि गण यांची संख्या घटवून २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पुणे जिल्हा परिषद गटांची संख्या ८२ वरून ७३ आणि पंचायत समिती गणांची संख्या १६४ वरून १४६ झाली होती. पुणे जिल्हा परिषदेत ८२ सदस्य निवडून जाणार की ७३ किंवा २०१७ प्रमाणे सदस्य संख्याही ७५ असणार याबाबत अधिकृतपणे प्रशासनाकडून कुठलीही माहिती देण्यात येत नाही.

जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याने, पुणे जिल्ह्यातील गट आणि गणांची संख्या कमी होणार असल्याचे निश्चित झाले होते. यानुसार जिल्हा परिषदेच्या २०१७ मधील ७५ गटांची संख्या दोनने कमी झाली आणि ती ७३ झाली होती. बारामती तालुक्यातील माळेगाव त्याचबरोबर वडगाव मावळ आणि देहू येथे नव्याने नगरपंचायतींची निर्मिती झाली, परिणामी अडीच लाख लोकसंख्या ग्रामीण क्षेत्रातून कमी झाल्याचा फटका बसून जिल्हा परिषदेचे दोन गट कमी झाले होते.

आता यामध्ये ८२ सदस्य जिल्हा परिषदेवर जाणार की ७३, किंवा न्यायालयाच्या निर्देशानुसार २०१७ असलेली ७५ जिल्हा परिषद सदस्य संख्या राहणार हे शासनाच्या निवडणूक प्रक्रियेबाबतचा निर्णय जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!