SA vs IND 2025: गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 408 धावांनी दणदणीत पराभव करून 2-0 ने मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेने तब्बल 25 वर्षांनंतर हे यश मिळवलं आहे. यापूर्वी 2000 साली दक्षिण आफ्रिकेने भारतात टीम इंडियाचा 2-0 असा क्लीन स्वीप केला होता. आता, जवळपास दीड दशकानंतर पुन्हा एकदा भारताला घरच्या मैदानावर अशी नामुष्की पत्करावी लागली आहे.
दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर मोठे लक्ष्य
दक्षिण आफ्रिकेने हा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतासमोर ५४९ धावांचे आव्हान ठेवले होते. शेवटच्या दिवशी टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी ५२२ धावांची आवश्यकता होती. चौथ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेने भारताचे दोन बळी घेतले होते. शेवटच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने दोन सत्रात उर्वरित आठ बळी मिळवून ऐतिहासिक विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
सायमन हार्मर आणि मार्को जेन्सन हे दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे नायक होते. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. वेगवान गोलंदाज मार्को जेन्सनने पहिल्या डावात सहा बळी घेतले, तर दुसऱ्या डावात त्याने फक्त एक बळी घेतला. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेसाठी सायमन हार्मरने सर्वाधिक आठ बळी घेतले. त्याने पहिल्या डावात तीन बळी घेतले होते. सामन्यात हार्मरचा एकूण नऊ होता. मार्को जेन्सननेही पहिल्या डावात फलंदाजी करताना ९३ धावांची शानदार खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ धावा केल्या
या कसोटी सामन्याबाबत, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघाने ४८९ धावा केल्या. पहिल्या डावात संघाकडून सेनुरन मुथुसामीने १०९ धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात, संघ पहिल्या डावात २०१ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर आफ्रिकन संघाने दुसऱ्या डावात २६० धावांवर आपला डाव घोषित केला आणि भारतासमोर ५४९ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, टीम इंडिया दुसऱ्या डावात १४० धावांवर ऑलआउट झाली आणि ४०८ धावांनी सामना गमावला.


