Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Mayor: मुंबईतही मनसेचा पाठिंबा घेणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

BMC Mayor: मुंबईतही मनसेचा पाठिंबा घेणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

BMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत मनसे आणि शिंदे गटाने एकत्र येत ठाकरे गटाला धक्का दिला आहे. या यशस्वी प्रयोगानंतर आता मुंबई महापालिकेतही (BMC) मनसे महायुतीला साथ देणार का? या चर्चेने जोर धरला आहे. या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सूचक विधान करत मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुंबईत मनसेचा पाठिंबा घेणार का, या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळत शिंदे म्हणाले, “जर आणि तरच्या गोष्टी करण्यापेक्षा सध्याची परिस्थिती पहा. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या सर्व ठिकाणी महायुतीचाच महापौर विराजमान होईल.” दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही ‘राजकारणात काहीही होऊ शकतं’ असं विधान करून युतीच्या शक्यतांना वाव दिला आहे.

हेही वाचा – Eknath Shinde: राजकीय हालचालींना वेग! मुंबईच्या महापौर पदाबाबत सस्पेंस कायम; एकनाथ शिंदेंनी गाठली दिल्ली

मुंबई पालिकेतील जागांचे गणित

मुंबईत बहुमतासाठी ११४ हा आकडा गाठणे आवश्यक आहे. सध्या कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही:

  • भाजप: ८९ जागा
  • शिवसेना (शिंदे गट): २९ जागा
  • शिवसेना (ठाकरे गट): ६५ जागा
  • मनसे: ६ जागा

शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यास हा आकडा ११८ वर जातो, जो बहुमतापेक्षा जास्त आहे. तरीही राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेऊन आपली बाजू अधिक भक्कम करण्याचा महायुतीचा प्रयत्न असू शकतो. कल्याण-डोंबिवलीतील ‘मैत्री’ मुंबईतही दिसणार की भाजप-शिंदे गट स्वबळावर सत्ता काबीज करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!