Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: चारित्र्याचा संशय अन् हुंड्याची हाव! विवाहितेला चामड्याच्या पट्ट्याने अमानुष मारहाण

Pune Crime: चारित्र्याचा संशय अन् हुंड्याची हाव! विवाहितेला चामड्याच्या पट्ट्याने अमानुष मारहाण

Pune Crime: पुण्यातून कौटुंबिक हिंसेची एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील एका विवाहितेचा सासरच्या मंडळींनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन आणि माहेरून दागिने आणण्याच्या मागणीसाठी पीडितेवर चामड्याच्या पट्ट्याने वार करून तिला नरकयातना सोसाव्या लागल्या आहेत.

छळाचा ‘क्रूर’ कळस

भाग्यश्री हितेश पारगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ जून २०२४ पासून ते मे २०२५ पर्यंत त्यांच्यावर सासरच्यांकडून अमानुष अत्याचार करण्यात आले. संशयित आरोपींनी केवळ पैशांच्या हव्यासापोटी नव्हे, तर लग्नातील मानपान मिळाला नाही या क्षुल्लक कारणावरूनही पीडितेला लक्ष्य केले. पती हितेश पारगे याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार चामड्याच्या पट्ट्याने मारहाण केली. सोन्याची अंगठी आणि चांदीच्या भांड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी सासरच्यांकडून सतत दबाव टाकला जात होता. तसेच विरोध केल्यास माहेरच्या लोकांना संपवून टाकू, अशी धमकी दिली जात असे. छळादरम्यान आरोपींनी भाग्यश्री यांचे मंगळसूत्र आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन त्यांना गंभीर दुखापत केली.

हेही वाचा – मोठी बातमी! गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून सासवड पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंदेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर भाग्यश्री यांनी पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!