Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News: खाकीचं स्पप्न ठरलं जीवघेणं! पुण्यात पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान धावताना तरुणाचा जागीच मृत्यू

Pune News: खाकीचं स्पप्न ठरलं जीवघेणं! पुण्यात पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान धावताना तरुणाचा जागीच मृत्यू

Pune News: पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका तरुणाचा धावताना मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मैदानात घडली आहे. पुरुषोत्तम बुरकुल असे या दुर्दैवी उमेदवाराचे नाव असून, प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा प्राण गेल्याचे समोर आले आहे.

मैदानावर नेमकं काय घडलं?
राज्यभरात सध्या पोलीस भरतीची धामधूम सुरू आहे. पुरुषोत्तम हा देखील या भरती प्रक्रियेसाठी पुण्यात आला होता. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक चाचणी सुरू असताना, धावण्याच्या प्रकारात सहभागी झालेला पुरुषोत्तम अचानक कोसळला. उपस्थित वैद्यकीय पथकाने तातडीने मदत केली, मात्र त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. वाढत्या उन्हाचा तडाखा आणि शारीरिक ताण यामुळे हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
ग्रामीण भागातील हजारो तरुण बारावीनंतर पोलीस भरतीकडे वळतात. मात्र, मैदानी चाचणीपूर्वी शारीरिक क्षमतेकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तरुणांनी भरतीच्या तयारीला लागण्यापूर्वी हिमोग्लोबिन, रक्तदाब (BP), हृदयाचे ठोके आणि किमान एकदा ईसीजी (ECG) करून घेणे आवश्यक आहे. सध्या पुण्यात उन्हाचा पारा वाढला आहे. कडक उन्हात बराच वेळ उभे राहिल्याने किंवा धावल्याने शरीरातील पाण्याची पातळी (Hydration) खालावते. शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो, ज्यामुळे रक्तदाब कमी होऊन झटका येण्याची भीती असते.

भरती प्रक्रियेतील आव्हाने
पोलीस भरतीतील वाढती स्पर्धा आणि मर्यादित जागांमुळे उमेदवारांवर प्रचंड मानसिक आणि शारीरिक दडपण असते. अनेक तरुण अकॅडमीमध्ये सराव करतात, मात्र बदलत्या हवामानात स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. पुरुषोत्तमच्या निधनाने पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, कडक उन्हात होणाऱ्या चाचण्यांच्या वेळेबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!