Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! मुंबईत महायुती एकत्र रिंगणात उतरणार! इतर शहरांमध्ये स्वतंत्र रणनीती

मोठी बातमी! मुंबईत महायुती एकत्र रिंगणात उतरणार! इतर शहरांमध्ये स्वतंत्र रणनीती

Local Bodies Election: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील महायुती यांनी आपले निवडणूक धोरण निश्चित केले आहे. यानुसार, महायुती मुंबई महानगरपालिकेत एकत्र लढणार असून इतर महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढवेल. मात्र, निवडणूक निकालानंतर महायुती पुन्हा एकत्र येईल, अशी रणनीती आखण्यात आली आहे.

महायुतीचे हे धोरण मविआ आणि इतर विरोधकांकडून होऊ शकणाऱ्या लाभांना टाळण्यासाठी आखण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष वेगवेगळे लढल्यास मतांचे विभाजन होऊन मविआच्या उमेदवारांना फायदा मिळू शकतो. त्यामुळे महायुतीने मुंबईत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित ठिकाणी महायुती पक्ष स्वतंत्र लढतील आणि निवडणूक संपल्यानंतर पुन्हा एकत्र येतील.

हेही वाचा –Devendra Fadnavis : महायुती की स्वबळ? स्थानिक निवडणुकीचा निर्णय जिल्हाध्यक्षांवर; फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना याबाबत संकेत दिले. ते म्हणाले, मुंबईत महायुती एकत्र लढेल, तर इतर भागात रणनीतीनुसार निर्णय घेतला जाईल. मुंबई महानगरपालिका हे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची ठिकाण आहे. मुंबईत महायुतीला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या नेतृत्वाच्या युतीला तोंड देणे हे महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.

हेही वाचा –ठाकरे बंधूंसह मविआ नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार; पण शरद पवार अनुपस्थित, नेमकं कारण काय?

ठाणे महानगरपालिकेतील राजकीय समीकरण

दरम्यान, ठाणे महानगरपालिकेतील स्थिती पाहता 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते, जिथे शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यावेळी 67 नगरसेवक निवडून आले, तर भाजपचे फक्त 23 नगरसेवक निवडले गेले. मात्र, आताच्या काळात ठाण्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. त्यामुले ठाण्यात महायुती पक्ष वेगवेगळे लढल्यास स्थानिक पातळीवर तुफान संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!