Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! उत्पन्न आणि आत्मनिर्भरता वाढविण्यासाठी पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेत राज्यातील 9 जिल्ह्यांचा समावेश

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! उत्पन्न आणि आत्मनिर्भरता वाढविण्यासाठी पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेत राज्यातील 9 जिल्ह्यांचा समावेश

मुंबई: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘पंतप्रधान धन धान्य कृषी योजना’ (PMDDKY) देशभरातील 100 जिल्ह्यांत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्रासाठी राज्यस्तरीय कार्यक्रम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने या योजनेद्वारे कमी उत्पादकता, अपुरी सिंचन व्यवस्था आणि कर्जपुरवठ्याचा अभाव अशा अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील सहा वर्षांत २४,००० कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प या योजनेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये धान्य साठवणूक, प्रक्रिया उद्योग, सिंचन सुधारणा आणि स्थानिक रोजगार निर्मिती या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाईल.

हेही वाचा – शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ..! कर्जमाफीचा नाद असल्याने आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो, सहकारमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले, ही योजना शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे. यामुळे शाश्वत शेती, जलसंधारण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल. शेतीला बळकटी आणि शेतकऱ्यांना दिलासा हेच या योजनेचे खरे उद्दिष्ट आहे. या उपक्रमांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या ११ विभागांतील ३६ योजना एकत्र राबविल्या जाणार आहेत. या योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायत, कृषी विज्ञान केंद्रे (KVK), कृषी बाजार समित्या, किसान समृद्धी केंद्रे आणि सहकारी पतसंस्था (PACS) या स्तरावर केली जाईल.

हेही वाचा – Solapur: बँक ऑफ महाराष्ट्रमधून शेतकऱ्याचा 4 लाखांचा चेक लंपास; कर्मचाऱ्याचा कामचूकारपणा उघड

उद्याच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ३०० हून अधिक प्रगत आणि नाविन्यपूर्ण शेतकरी सहभागी होणार आहेत. यावेळी नैसर्गिक शेती, डाळी अभियान आणि पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेचा शुभारंभ देशभरातील जिल्हा मुख्यालये आणि कृषी संस्थांमधून थेट प्रक्षेपणाद्वारे केला जाईल. मंत्री भरणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे या महत्त्वाकांक्षी आणि शेतकरी-केंद्रित उपक्रमात महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश केल्याबद्दल आभार मानले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!