Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पप्पा नको हो गावाला, बिबटया खाईल आम्हाला; ऐन दिवाळीत शहरी मुलांवर बिबट्याची प्रचंड दहशत

पप्पा नको हो गावाला, बिबटया खाईल आम्हाला; ऐन दिवाळीत शहरी मुलांवर बिबट्याची प्रचंड दहशत

शिरूर: ‘पप्पा, गावाकडे नको… बिबट्या पोरांना खातोय हो…’ एका लहान मुलीचे हे निरागस शब्द आता शिरूर तालुक्याच्या पिंपरखेड-जांबुत परिसरातील वस्तुस्थितीचे भयावह चित्र उभे करतात. गेल्या आठवड्यात बिबट्यांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याने या भागावर दहशतीचे सावट पसरले आहे. कधी शेतीसाठी ओळखला जाणारा घोड-कुकडी नदीकाठचा हा पट्टा आता लोकांच्या तोंडी ‘बिबट्यांचा शिकार पट्टा’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

दोन आठवड्यात दोन बळी

पिंपरखेड गावातील चिमुकली शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांनी जांबुत येथील भागुबाई जाधव (वय ५५) या पाडव्याच्या दिवशी पहाटेच बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेल्या. सलग दोन घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्यांच्या दहशतीमुळे गावातील रस्ते संध्याकाळी ओस पडले आहेत. बिबट्याच्या दहशतीने अनेक घरांना कुलूप लागले आहे. शहरात राहणारे लोक यंदा दिवाळीत गावाकडे फिरकलेच नाहीत.

हेही वाचा – पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ! मानवी रक्षणासाठी बिबट्यांची नसबंदी; 50 बिबटे वनतारामध्ये पाठवणार- अजित पवार

वनविभागावर दबाव वाढला

सततच्या घटनांमुळे वनविभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या भागात रात्रीची गस्त वाढवणे, पिंजरे वाढवणे, बिबट्यांची नसबंदी मोहिम राबवणे, आणि शाळा-शेत मार्गांवर सुरक्षाव्यवस्था करणे अशा मागण्या नागरिकांकडून केल्या जात आहेत. केंद्र सरकारकडे वन्य प्राण्यांबाबतचे कायदे बदलण्याची मागणी देखील झाली आहे, जेणेकरून तातडीने उपाययोजना करता येतील.

या भागातील लोकांसाठी दिवाळीचा उत्सव आता भीतीच्या सावटात गेला आहे. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही दिवाळीचे सण साजरे न करता बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. दिवाळीचा उजेड पसरला असला तरी पिंपरखेड–जांबुत परिसरात अंधार कायम आहे. कारण, गावांची रात्र आजही बिबट्याच्या भीतीने जागी आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!