Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द झाला नाही! राजू शेट्टींचा खळबळजनक दावा

जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द झाला नाही! राजू शेट्टींचा खळबळजनक दावा

पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहार सोमवारी रद्द झाला. शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांच्या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने आता शेतकरी-समाजनेते आणि जैन समाजाचे प्रमुख प्रचारक राजू शेट्टी यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी गोखले डेव्हलपर्सकडून प्राप्त झालेल्या पत्राचा हवाला देत दावा केला की, व्यवहार प्रत्यक्षात ‘रद्द’ झाला नाही तर विक्रेत्यांनीच HND ट्रस्टीला पत्र पाठवून ‘आम्हाला तो व्यवहार रद्द करायचा आहे’ असे लिहिलेले आहे.

व्यवहार पूर्णपणे रद्द व्हायला हवे

राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, सध्या गोखले डेव्हलपर्सकडून आलेल्या पत्रावरून HND ट्रस्टीची भूमिका अस्पष्ट आहे. म्हणूनच त्यांच्या मते, व्यवहार पूर्णपणे रद्द व्हावा आणि कागदोपत्री HND बोर्डिंगचे नावच या जागेवर नोंदवले जावे. आमचा लढा तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत वास्तविक व्यवहार रद्द झाल्याची स्पष्ट नोंद होत नाही. ते पुढे म्हणाले की, जर ट्रस्टी आवश्यक ती पावले उचलली नाही तर त्यांचा संघ ट्रस्टमधील संभाव्य गैरव्यवहार बाहेर काढेल.

मुरलीधर मोहोळांबाबत शेट्टींचे मत

दरम्यान, केंद्रीय मंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दलही शेट्टींनी स्पष्ट भूमिका मांडली. शेट्टी म्हणाले की सुरुवातीला मोहोळांनी या व्यवहाराशी त्यांचा काही संबंध नसल्याचे सांगितले होते. परंतु नंतर मोहोळांनी जैन बोर्डिंगच्या प्रतिनिधींच्या मागण्यांनुसार गोखले बिल्डरशी संपर्क साधल्याचे आणि व्यवहार रद्द करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे स्पष्ट केले. आमचा लढा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी होता. या बोर्डिंगमध्ये जवळपास 250 विद्यार्थी शिकत होते. त्या विद्यार्थ्यांना 1 जूनपासून तिथून बाहेर काढले होते. आमचा लढा या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी होता. ते विद्यार्थी जोपर्यंत बोर्डिंगमध्ये परत येत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – मोठी बातमी..! पुण्यातील जैन बोर्डिंग जागेचा व्यवहार बिल्डरने केला रद्द

शेट्टींचा दावा आहे की, साडेतीन एकर जमिनीवर मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचा धोकाही आहे. ही जमीन सोन्याच्या तुकड्यासारखी आहे. त्यावर हजार-दीड हजार कोटींचे घोटाळे होऊ शकतात, असेही ते म्हणाले. त्यामुळे प्रथम टप्प्यात गोखलेचे नाव हटवून HND चे नाव कागदोपत्री नोंदवले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. तथापी, राजू शेट्टी म्हणाले की, एकदा HND चे नाव नोंदवल्यानंतरच पडद्याआड घडलेल्या घटनांचा आणि मंजुरी प्रक्रियेतील शक्य असलेल्या अनियमिततेचा शाब्दिक व लेखी तपास करता येईल. जोपर्यंत त्या सर्व चौकश्या आणि लेखी पुरावे समोर येत नाहीत, तोपर्यंत ते शांत बसणार नाहीत, असाही इशारा त्यांनी दिला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!